शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

चंद्रपूर : पूर्वी गूळ गरिबांचा तर साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. मात्र दिवस बदलले आणि गुळातील गुणधर्मामुळे मागणी ...

चंद्रपूर : पूर्वी गूळ गरिबांचा तर साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. मात्र दिवस बदलले आणि गुळातील गुणधर्मामुळे मागणी वाढली. त्यातच आरोग्याची अधिक काळजी असलेले शहरी भागातील नागरिक गुळाचा चहा पिणे स्टेटस समजू लागले. त्यामुळे मोठमोठ्या हाॅटेलमध्येही आता गुळाचा चहा मिळू लागला आहे. आरोग्यवर्धक असलेला गूळ आता साखरेपेक्षाही महाग झाला आहे.

साखर उद्योग अस्तित्वात यायच्या पूर्वी उस उत्पादक गुळाची निर्मिती करायचे. त्यामुळे मुबलक प्रमाणात गूळ मिळत होता. तर साखर फारच मोजक्या नागरिकांकडे रहायची. साखर घरी असली तर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. दरम्यान, साखर उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहिले आणि साखरेची मागणी वाढली. परिणामी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या गुळाची मागणी घटली. आता मात्र

आरोग्याच्या समस्या वाढत असल्यामुळे नागरिक पुन्हा गुळाकडे वळले आहे. विशेषत: शहरी भागामध्ये गुळ‌ाला अधिक मागणी आहे. गुळामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी -१२, व्हिटॅमिन बी- ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारखे पोषक घटक असते. गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. तसेच चयापचनाची क्षमता वाढण्यासही मदत करते. त्यामुळे आता नागरिक पुन्हा गुळाकडे वळले आहे.

बाॅक्स

गुळाचा चहा बनले स्टेटस

पूर्वी गुळाचा चहा पिण्यासाठी नागरिक नाक मुरडत होते. मात्र आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे गुळाची मागणी वाढली आहे. एवढेच नाही तर नागरिक स्टेटससाठी घरी गुळाचा चहा पित असल्याचे दिसून येते.

गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करतात.

गुळामध्ये पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्त्वांचा साठा आहे. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्याच नियमित सेवन केल्यास पचनसंस्थेच कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. औषधी गुणधर्मांमुळे अन्नपदार्थांचे पचन होते.

बाॅक्स

प्रकृतीसाठी गूळ चांगला

गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला लाभ मिळतात. नैसर्गिक स्वरूपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश नागरिक गूळ सेवन करतात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे नियमित वापर

केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदाच होता. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

शहरात गुळाला मागणी

आरोग्याची विशेष काळजी घेणाऱे नागरिक आता गुळाकडे वळले आहे. गुळातील पोषण गुणधर्मामुळे ते नियमित वापर करीत आहेत.त्यामुळे पूर्वीच्या तुलनेमध्ये सध्यास्थितीत गुळाची मागणी वाढली आहे.

बाॅक्स

गावात मात्र साखरच

ग्रामीण भागामध्ये शेती तसेच इतर कामधंदे करून नागरिक जीवन जगतात.

त्यामुळे स्टेटसच्या भानगडीच न पडता ते नियमित साखरेचाच चहा पीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आजही साखरेची मागणी अधिक आहे.