शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सीमावर्ती राज्यातून दारूची तस्करी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:18 IST

गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्करी रोखण्याचे निर्देश .......

ठळक मुद्देहंसराज अहीर : कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्करी रोखण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले.जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था संदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार निधीतून झालेल्या कामाचा आढावा घेत प्रलंबित असलेल्या कामाबाबत संबंधित विभागाला जाब विचारला. तर पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये वेगवेगळ्या कामांची सूचना केली. जिल्हाभरातील कामांमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये खासदार निधीचा खर्च अधिकाधिक होईल, याकडे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश दिले.दुपारी सांसद आदर्श ग्राम बैठक झाली. या बैठकीमध्ये विकास कामांमध्ये येणाºया अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व सिंचनाच्या संदर्भातील अडचणी दूर करावे. कृषी विभागाने बायोगॅस प्रकल्पाबाबत गतिशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना शेळीपालन व शेडसाठी निधी उपलब्ध करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली. दारूबंदी करण्यासाठी महिला बचतगट व विविध संघटनांनी मोलाचे योगदान दिले होते. पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पंरतु, अन्य राज्यातून तस्करी होवू शकते. त्यामुळे सीमावर्ती गावांतील नागरिकांचे सहकार्य घ्यावे, असेही ना. अहीर यांनी सांगितले. या बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ उपस्थित होते.पीक कर्ज वाटपात बँकांनी गती आणावीजूनचा पहिला आठवडा सुरू झाला असतानादेखील खरिपासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज शेतकºयांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. हे अपयश बँकांचे आहे. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात यासंदर्भातील प्रक्रियेमध्ये गती आणा, या शब्दात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवीद्र शिवदास, शिखर बॅकेचे एस.एन. झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आणि टंचाईचे नियोजन, विविध योजना व प्रधानमंत्री खनिज विकास निधीअंतर्गत येणारी योजनांसंदर्भात अंमलबजावणी कशी झाली, याचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :liquor banदारूबंदी