शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सत्य, सकारात्मक विचार हीच पत्रकारितेची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:35 IST

वसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाºया पत्रकारितेचा दबदबा आजही या व्यवसायातील सकारात्मक वृत्तीवर टिकून आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाºया पत्रकारितेचा दबदबा आजही या व्यवसायातील सकारात्मक वृत्तीवर टिकून आहे. त्यामुळे सभोवताली कितीही नकारात्मकता वाढली तरी तुमची वाटचाल सकारात्मकतेवर असू द्या, पत्रकारितेची तीच शक्ती आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्काराचे रविवारी प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, आ. सुरेश धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गांवडे, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे व सचिव प्रशांत विघ्नेश्वर उपस्थित होते.पत्रकारितेतील नकारात्मक शक्तीबद्दल चिंता व्यक्त करीत ना. मुनगंटीवार यांनी ‘आजकाल मी वर्तमानपत्र वाचने बंद केले’ अशा प्रतिक्रिया ऐकायला येतात. ही बाब या व्यवसायासाठी चिंताजनक आहे. बातमी विरोधात असो अथवा एखाद्याच्या बाजूने, मात्र बातमीचा गाभा सत्य असावा. बातमी कोणत्याही परिस्थितीत सत्यावर आधारीत असली पाहिजे. बातमीत सत्य असेल तर मग तुम्हाला कोणाचीच भिती ठेवण्याची गरज नाही. अन्य व्यवसायाप्रमाणे या व्यवसायातही नकारात्मक शक्ती मोठया प्रमाणात एकवटत आहे. मात्र माझी बाजू सत्याची असून अशी भूमिका असली पाहिजे. अशाच पत्रकारांची पत्रकारिता बहरते व फुलते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत असून स्थानिक समस्या आगामी काळात सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रमोद काकडे यांनी तर आभार प्रशांत विघ्नेश्वर यांनी मानले.यांना मिळाले पुरस्कारयावेळी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठित मानला जाणारा कर्मवीर सन्मान पुरस्कार जेष्ठ पत्रकार मोहन रायपूरे यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. तर शुभवार्ता पुरस्कार राकेश गोविंदवार, मानवी स्वारस्य अभिरुची कथा पुरस्कार संदीप रायपूरे व निलेश झाडे यांना संयुक्तरित्या देण्यात आला. तसेच हौशी वृत्तछायाचित्र पुरस्कार राहुल चिलगीलवार, उत्कृष्ठ वृत्तांकन (टिव्ही) पुरस्कार अनवर शेख तर ग्रामीण वार्ता पुरस्कारामध्ये लोकमतचे पोंभुर्णा येथील शहर प्रतिनिधी विराज मुरकुटे यांना प्रथम, व्दितीय रविंद्र नगराळे, तृतीय जितेंद्र सहारे तर प्रोत्साहनपर पुरस्कार प्रा.डॉ.धनराज खोनोरकर व रवि शेंडे यांना देण्यात आला.मराठी पत्रकारितेचा झेंडा देशभर : संजय राऊतपत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रात चंद्रपूर शहराचा मोठा ठसा महाराष्ट्रावर उमटला आहे. पत्रकारितेचा गाभा मनातली तळमळ, वेदना असते. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या सोप्या शब्दात बातमीचे लेखन झाले पाहिजे. त्यांचे संपूर्ण साहित्य अगदी सोप्या भाषेत सामान्यांच्या वेदना व्यक्त करतात. पत्रकारांची भाषा देखील अशीच सामान्यांच्या वेदनेचा वेध घेणारी असली पाहिजे. पत्रकारांनी आपल्या समस्यांवर नक्कीच बोलावे, मात्र पत्रकारिता हाच आपला धर्म असल्याचे विसरु नये. लेखन ही आपली ओळख असते. त्यामुळे हातातला पेन आणि त्यातून उमटणारे मनातील शब्दांना अन्य कितीही माध्यम आली तरी येणाºया काळातही पर्याय असणार नाही. आजही आम्हाला समाजावर प्रभाव टाकणारी पत्रकारिता म्हणून लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव घ्यावे लागते. पुढच्याही काळात मुद्रीत माध्यमांची ताकद कायम राहणार असून ग्रामीण पत्रकारांनी हे बळ वृत्तपत्रांना दिले आहे. म्हणूनच मराठी पत्रकारितेचा झेंडा देशभर टिकून असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.