शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कुटपालन व्यवसायिक डबघाईस

By admin | Updated: November 7, 2016 01:29 IST

शेतीसोबतच जोडधंदा करून आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा

शासनाचे दुर्लक्ष : खाजगी कंपनीची मक्तेदारी चिखलपरसोडी : शेतीसोबतच जोडधंदा करून आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता कुटीरउद्योगांना चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनाच्या माध्यमातून शेतीपुरक जोडधंद्याकडे बळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामध्ये कुक्कुटपालन, गोटफार्म, वराहपालन, नेटहाऊस, औषध प्लॉट स्टेशन यासारख्या व्यवसायाकरिता तालुकास्तरावरून बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. याचा फायदा घेत अनेक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी घेत असले तरी ते कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपनीच्या मक्तेदारीमुळे डबघडीस आले आहेत.खाजगी कंपनीकडे स्वत:चे शेड आहे. या कंपन्या स्वत:चा माल स्वत:च तयार करून स्वत:च बाजारामध्ये विक्री करतात. त्यामध्ये काही व्यवसायिकही कंपनीच्या अटीनुसार सहभागी होतात. त्याकरिता साधारणत: ३५०० हजार नग कोंबडी तयार करण्याची क्षमता असलेले शेड असणे गरजेचे आहे. त्यामुळे यामध्ये हजार- दोन हजाराची क्षमता असलेले आणि लहान व्यवसायिक सहभागी होऊ शकत नाहीत.आजची स्थिती पाहून जाता एक दिवसाच्या बॉयलर जातीच्या एका पिलाची किंमत ३५ रुपये आहे. ते दोन किलो वजनाचे बनण्यासाठी साधारणत: तीन ते साडेतीन किलो खाद्य लागते.सोबत औषध, कोंडा व इतर खर्च एकत्र केल्यास कंपनीच्या खरेदीभावापेक्षा लागत खर्च अधिक होत आहे. त्यामुळे शासनाद्वारे या व्यवसायाकडे जातीने लक्ष दिले किंवा खाजगी कंपनीवर खरेदी-विक्रीच्या काही अटी घातल्या तर शेतीसोबतच या व्यवसायाला चांगले दिवस येतील. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या मागे न लागता निश्चितच अशा व्यवसायाकडे कळू शकतात. (वार्ताहर)भाव ठरविण्यात कंपन्यांचा एकाधिकारया व्यवहारात तयार कोंबड्यांचा खरेदी दर कंपनी ठरवित असल्याने बाजारभावसुद्धा त्यानुसार चालतो. लहान व्यवसायिक कंपनीची जोडलेला नसतानासुद्धा त्याची झळ त्याला सोसावी लागत आहे. सणासुदीला व दिवस पाहून या कंपन्या दररोज खरेदी भावाचा चढउतार करीत असतात. या व्यवसायामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणावर लागत असते. तर त्यानुसार निघणारा माल व त्यावेळेस बाजाराची स्थितीनुसार कंपनी भाव निश्चित करते. तोच भाव सर्वांसाठी ठरत असल्याने लहान कुक्कुटपालन व्यवसायिकांना कधीकधी तोटाही सहन करावा लागत आहे.