शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या विळख्यात अडकली कोवळी मुले

By admin | Updated: October 27, 2015 01:15 IST

मोबाईलच्या विळख्यात कोवळी पिढी अडकल्याने त्यांच्या मनावर दुष्पपरिणाम होत असून मोबाईलचा वापर ही कोवळी

विरुर (स्टे.): मोबाईलच्या विळख्यात कोवळी पिढी अडकल्याने त्यांच्या मनावर दुष्पपरिणाम होत असून मोबाईलचा वापर ही कोवळी मुले गैरप्रकारासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक प्रगत युगात अनेक क्षेत्रात विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती केली. त्यातीलच संदेश वहन व संप्रषनाचे प्रभावी वाहक म्हणून भ्रमणध्वनीची निर्मिती झाली आणि हळूहळू आजच्या धकधकीच्या व धावपळीच्या जीवनातील जलद संपर्क म्हणून मोबाईल हा जीवनावश्यक भाग बनला. कॉलरेटच्या स्पर्धेत टिकण्यासाठी किंमतील विलक्षणीय घट केल्याने सामान्य माणसालासुद्धा मोबाईल वापरणे शक्य झाल्याने मोबाईल कंपन्याचा ‘हर हात में मोबाईल’ हा नारा खरा होत आहे. परंतु ज्या जीवनाश्यक वस्तू बनलेल्या मोबाईलचे सदुपयोग होण्यापेक्षा दुरुपयोग अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजच्या युगात मोबाईलचे स्त्रोत हे मोठ्या शहरातून थेट ग्रामीण भागात झपाट्याने पसरले असून या मोबाईलच्या जाळ्यात अनेक ग्रामीण अल्पवयीन विद्यार्थी गुरफटत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अनेक चायनामेड, विदेशी कंपन्यांनी अगदी स्वस्त किंमतीत अनेक आकर्षक मोबाईल उपलब्ध केले असल्याने युवा पिढीचा कल ब्रॅन्डेड मोबाईलपेक्षा चायनाकडे वळल्याचे दिसून येत आहे. तसेच या मोबाईलमध्ये अनेक सोई-सुविधा असल्याने चौकाचौकांत टपऱ्यांवर असणारे हे अल्पवयीन मुले मोबाईलमधील ब्लू टुथस्, वॉस्टअपचा वापर अश्लिल चित्रफित पाहण्यासाठी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक श्रीमंत पालक आपल्या मुलांना अल्पवयातच मोबाईल खरेदी करुन देतात. त्याचा ही मुले दुरूपयोग करीत आहेत. जर एखाद्याला असा नंतर तो प्राप्त झाला नाही, तर मोबाईल खरेदी करण्यासाठी तो चोरी करण्यासाठीही मागेपुढे पाहात नाही. मोबाईलचे दुकान फोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.मोबाईलमधील साऊंड सेटींगद्वारे विविध प्रकारचा आवाज काढता येतात. वृद्ध, लहान मुलांचे, स्त्रीचे, माणसांचे, तरुण मुलींचे अशा विविध आवाजातून स्वत:च्या मोबाईलमधून आवाज सेट करुन स्वत:चा आवाज मुलींच्या आवाजात बदलवून अनेक मुलींशी अश्लिल बोलून त्यांना त्रास देण्याचे प्रकारही वाढत आहे. मोबाईलमुळे पाहिजे त्यावेळी संपर्क घडून येत असल्याने मोबाईल तरूणाईच्या गळ्यातील ताईत झाला आहे. (वार्ताहर)