शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल वाॅशरीच्या प्रदूषण व ट्रक पार्किंगमुळे नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

घुग्घुस : दोन महिन्यांपूर्वी उसगाव रस्त्यावरील गुप्ता कोल वाॅशरी सुरू झाल्यापासून प्रदूषण वाढले आहे. याशिवाय कोळसा भरलेले व खाली ...

घुग्घुस : दोन महिन्यांपूर्वी उसगाव रस्त्यावरील गुप्ता कोल वाॅशरी सुरू झाल्यापासून प्रदूषण वाढले आहे. याशिवाय कोळसा भरलेले व खाली ट्रक उसगावच्या रस्त्यावर पार्किंग करीत असल्याने रस्त्यावरील रहदारीला अडचण निर्माण झाली असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील पार्किंग बंद करून कोळसा वाॅशरीने पार्किंग व्यवस्था आपल्या हद्दीत करावी, अशा मागणीचे पत्र उसगावच्या सरपंच निविता धनंजय ठाकरे यांनी वारंवार दिले. मात्र, पत्राची दखल घेतली नाही.

तत्काळ रस्त्यावरील पार्किंग बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या क्षेत्रातील विविध कोल वाॅशरीज मागील अनेक वर्षांपासून बंद होत्या. त्यापैकी उसगाव रस्त्यावरील गुप्ता कोल वॉशरी दोन महिन्यापासून सुरू झाली. दरम्यान, वाॅशरीच्या प्रदूषणामुळे व कोळसा वाहतुकीच्या वाहनामुळे आजूबाजूच्या शंभर एकर शेतजमिनीवरील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. या वाशरीच्या कोळसा वाहतुकीच्या वाहनांच्या पार्किंगसाठी उसगाव-शेणगाव रस्त्याचा उपयोग होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून इतर वाहनांच्या रहदारीला अडचण निर्माण झाली व अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

कोल वॉशरीने आपल्या हद्दीत ट्रक पार्किंगची व्यवस्था करावी, असे निवेदन उसगावच्या सरपंच निविदा ठाकरे यांनी गुप्ता वाॅशरीच्या व्यवस्थापनाकडे केली आहे. मात्र, अजूनही दखल घेतली नसल्याने वाहतुकीची समस्या अधिक वाढत आहे. वाॅशरीने तत्काळ ट्रक पार्किंग यार्ड बनवून रस्त्यावरील पार्किंग हटवावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.