शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

राजकीय आखाड्यासाठी राजकीय नेते सज्ज!

By admin | Updated: July 10, 2015 01:33 IST

राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून.

राजुरा: राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून ही निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटनानी मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे.राजुरा तालुक्यातील चार्ली, चिंचोली (खु.), चुनाळा, गोवरी, कठोली (बु.), कविठपेठ, मुठरा, पेल्लोरा, विहिरगाव, वरोडा, बामनवाडा, चंदनवाही, चिचोली (बु.), कोहपरा, कोलगाव, मूर्ती, पंचाळा, पवनी, सातरी, चनाखा, धानोरा, कळमना, खामोना, मारडा, नलफडी, सिंधी, सुमठाना, धिडसी या २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंत्यत चुरशीच्या होणार असून प्रत्येक गावामध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना सक्रीय आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षासोबत युती करणार यावर पुढील चित्र दिसणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांना आपल्या कामाचा वेग वाढवून त्यांना नव्याने जोडणी करुन आपल्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपाची टक्कर काँग्रेस, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे.काँग्रेस पक्षानेसुद्धा निवडणुकीची मोर्चेबांधणी केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी व्युहरचना आखणे सुरू केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव पत्करावा लागल्यामुळे माजी आमदार सुभाष धोटे या निवडणुकीत कुठलीही जोखीम न घेता निवडणुक जिंकायची यासाठी सज्ज झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेलासुद्धा कमी लेखता येणार नाही. शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप सातत्याने मतदाराच्या संपर्कात असून ते कधीही थकताना दिसत नाही. इच्छुक उमेदवारांची त्यांनी पडताळणी सुरू केली असून उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे याची भूमिकासुद्धा निर्णायक राहणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हेदेखील निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून कार्यक्रम आखणीत ते तरबेज आहेत. ते स्वत: नियोजन करीत असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी तेदेखील सज्ज दिसत आहेत. या निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेच्या असल्याने सर्वांनीच त्या गांभीर्याने घेतल्या आहेत. पुन्हा एकदा मतदाराच्या दारात मत मागणीसाठी नेते मंडळी आश्वासनाच्या खैराती घेऊन येणार आहेत. (शहर प्रतिनिधी)