शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

राजकीय आखाड्यासाठी राजकीय नेते सज्ज!

By admin | Updated: July 10, 2015 01:33 IST

राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून.

राजुरा: राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून ही निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटनानी मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे.राजुरा तालुक्यातील चार्ली, चिंचोली (खु.), चुनाळा, गोवरी, कठोली (बु.), कविठपेठ, मुठरा, पेल्लोरा, विहिरगाव, वरोडा, बामनवाडा, चंदनवाही, चिचोली (बु.), कोहपरा, कोलगाव, मूर्ती, पंचाळा, पवनी, सातरी, चनाखा, धानोरा, कळमना, खामोना, मारडा, नलफडी, सिंधी, सुमठाना, धिडसी या २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंत्यत चुरशीच्या होणार असून प्रत्येक गावामध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना सक्रीय आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षासोबत युती करणार यावर पुढील चित्र दिसणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांना आपल्या कामाचा वेग वाढवून त्यांना नव्याने जोडणी करुन आपल्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपाची टक्कर काँग्रेस, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे.काँग्रेस पक्षानेसुद्धा निवडणुकीची मोर्चेबांधणी केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी व्युहरचना आखणे सुरू केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव पत्करावा लागल्यामुळे माजी आमदार सुभाष धोटे या निवडणुकीत कुठलीही जोखीम न घेता निवडणुक जिंकायची यासाठी सज्ज झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेलासुद्धा कमी लेखता येणार नाही. शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप सातत्याने मतदाराच्या संपर्कात असून ते कधीही थकताना दिसत नाही. इच्छुक उमेदवारांची त्यांनी पडताळणी सुरू केली असून उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे याची भूमिकासुद्धा निर्णायक राहणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हेदेखील निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून कार्यक्रम आखणीत ते तरबेज आहेत. ते स्वत: नियोजन करीत असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी तेदेखील सज्ज दिसत आहेत. या निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेच्या असल्याने सर्वांनीच त्या गांभीर्याने घेतल्या आहेत. पुन्हा एकदा मतदाराच्या दारात मत मागणीसाठी नेते मंडळी आश्वासनाच्या खैराती घेऊन येणार आहेत. (शहर प्रतिनिधी)