शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: July 18, 2015 00:54 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा त्रास वाढलादेवाडा: राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे पाच वर्षापूर्वी बांधकाम केले होते. मात्र त्यानंतर याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हेच समजत नाही.रस्त्यावर जागोजागी खडे पडले असून खड्ड्यात दिवसागणीक वाढच होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप पसरला आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहेत. या भागातील बहुतांश जनता तेलगू भाषिक असल्याने त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाशी जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावे लागते, तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील लक्कडकोट, कोष्टाळा, घोट्टा आनंद गुड्डा, जंगू गुडा पारधी गुडा, सिद्धेश्वर देवाडा, येरगव्हान, सोंडो, सोनुर्ली, भुर्रकुंडा भेदोडा, वरुर रोड, टेंबुरवाही साखरवाही, तुलाना, सुमठाना आदी गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे पादचारी, दुचाकी, प्रवासी आॅटो चारचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तेलंगाणा प्रदेशाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे महामंडळाची बस नियमित वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करुनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढतच आहे. मालवाहू ट्रकांना दहा टनाची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटी वाहतुकदार एका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे अवजड वाहतुकीने रस्त्याचे बेहाल झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करुन या वाहतुकीला एक प्रकारे समर्थनच देत आहे. वाहतूक पोलिसांचाही यात वाटा असल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागातील अनेक रस्तेच गायब झाले आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)पावसामुळे त्रास वाढलापावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असून रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. अनेकदा अपघात घडून नागरिकांना अपंगत्व आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.