शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: July 18, 2015 00:54 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा त्रास वाढलादेवाडा: राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे पाच वर्षापूर्वी बांधकाम केले होते. मात्र त्यानंतर याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हेच समजत नाही.रस्त्यावर जागोजागी खडे पडले असून खड्ड्यात दिवसागणीक वाढच होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप पसरला आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहेत. या भागातील बहुतांश जनता तेलगू भाषिक असल्याने त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाशी जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावे लागते, तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील लक्कडकोट, कोष्टाळा, घोट्टा आनंद गुड्डा, जंगू गुडा पारधी गुडा, सिद्धेश्वर देवाडा, येरगव्हान, सोंडो, सोनुर्ली, भुर्रकुंडा भेदोडा, वरुर रोड, टेंबुरवाही साखरवाही, तुलाना, सुमठाना आदी गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे पादचारी, दुचाकी, प्रवासी आॅटो चारचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तेलंगाणा प्रदेशाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे महामंडळाची बस नियमित वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करुनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढतच आहे. मालवाहू ट्रकांना दहा टनाची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटी वाहतुकदार एका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे अवजड वाहतुकीने रस्त्याचे बेहाल झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करुन या वाहतुकीला एक प्रकारे समर्थनच देत आहे. वाहतूक पोलिसांचाही यात वाटा असल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागातील अनेक रस्तेच गायब झाले आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)पावसामुळे त्रास वाढलापावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असून रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. अनेकदा अपघात घडून नागरिकांना अपंगत्व आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.