शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

परप्रांतीय बांबू कामगार तीन दिवसांपासून उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 00:57 IST

वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी चुलीच पेटविल्या नाही...

वनविकास महामंडळातील प्रकार : पगारासाठी जंगलातच मजुरांचा ठिय्याकोठारी : वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी चुलीच पेटविल्या नाही व उपाशीपोटी जंगलात ठिय्या मांडून बसल्याचा प्रकार निदर्शनास आला. अन्नाविना तडफडणाऱ्या मजुरांकडे कोणी अधिकारी व कर्मचारी लक्ष देण्यास तयार नसल्याने ९० ते १०० मजूर कोठारी जवळील अडेझरी नाल्यावर रात्रदिवस काढत होते. हा अमानविय प्रकार गोंडपिंपरीचे राजेश कवठे, अरुण वापलवार यांना समजताच त्यांनी तातडीने मजुरांना अन्न पाण्याची व्यवस्था केली. या संतप्त प्रकाराने माणसातील माणूसकी हरविल्याची व मजुरांच्या शोषणाची गंभीर समस्या उघड झाली.मध्यप्रदेशातील बालाघाट येथील दीड ते दोन हजार मजूर मध्य चांदा वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्रात बांबु कटाईचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून करीत आहेत. आता बांबू कटाईचे कामे अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झालेल्या मजुरांना पूर्ण पगार घेवून घराकडे परतीचे वेध लागले आहे. या मजुरांना आवठडी बाजारासाठी २०० ते ३०० रुपये अ‍ॅडवान्स देण्यात येते. मात्र मागील दोन आठवड्यात मजुरांना पैसे देण्यात आले नाही. परिणामी मजुर धान्य, भाजीपाला व किराणा खरेदी केला नाही. त्यामुळे कामगार तीन दिवसांपासून उपाशी होते. या प्रकाराची माहिती होताच राजेश कवठे व अरुण वासलवार यांनी घटनास्थळावर त्वरीत दाखल झाले. मजुरांची परिस्थिती पाहून संताप व्यक्त करीत मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. कोठारीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, गोंडपिंपरीचे तहसीलदार मलिक विराणी, अडेझरीत दाखल झाले. वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रकाराची माहिती दिली. मात्र याकडे कुणीही फिरकून पाहिले नाही. अखेर झरण क्षेत्राचे वनाधिकारी अजय पवार व प्रफुल्ल निकोडे हे मजुरांना वेतन देण्यासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता आले व पगार वितरीत केला. (वार्ताहर)