शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

बल्लारपुरातील मोरपंखी पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

बल्लारपूर : बल्लारपूर हे शहर मोठ्या झपाट्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर आहे. त्याला कारणही तसेच आहे. मागील ...

बल्लारपूर : बल्लारपूर हे शहर मोठ्या झपाट्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर आहे. त्याला कारणही तसेच आहे. मागील ५-६ वर्षांत बल्लारपूरचा मोठ्या प्रमाणावर कायापालट झाला. महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक म्हणून येथील बसस्थानकाला मान मिळाला. दूर दूरवरून लोक हे बसस्थानक बघायला आजही येतात. यासोबतच शहराच्या शोभेसाठी मयूरपंखी पथदिवे लावले. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते बंद आहेत.

वॉर्डातील कानाकोपऱ्यात रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले. शहरात तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय इमारत, वाचनालय व सरकारी रुग्णालयांसारख्या अनेक शासकीय इमारती मागील काही वर्षांत बनविण्यात आल्या. शहराला अधिक सुशोभित करण्यासाठी मागील वर्षी नवीन वर्षाच्या पर्वावर येथील कालामंदिर ते जुने बसस्थानकपर्यंत चौपदरी रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून मोरपंखी पथदिवे लावण्यात आले होते. हे दिवे शहरातील साैंदर्यात निश्चितच भर पाडणारे होते. सोशल मीडियावरसुद्धा याची लोकांनी प्रशंसा केली. हे मोरपंखी दिवे काही महिने नित्यनेमाने सुरू होते. परंतु कालांतराने त्याचा लखलखाट बंद पडला व परिणामी ते मागील चार महिन्यांपासून बंद असून काहींची तर दशा खूपच वाईट झाली आहे. लाखो रुपये खर्च करून सुरू केलेले हे मोरपंखी दिवे परत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

===Photopath===

300621\20210629_061615.jpg

===Caption===

बल्लारपुरातील मोरपंखी शोभेच्या प्रकाश दिवे मागील अनेक महिन्यापासून बंद