शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हाटी करपली; डोळ्यात दाटली आसवं...!

By admin | Updated: September 13, 2015 00:46 IST

कोरपना तालुक्यातील बोरगाव, सोनुर्ली परिसरातील कपाशीचे उभे पीक करपून वाढून गेल्याची घटना ताजीच असताना नजिकच्या कवठाळा, ...

शेतकरी हादरले : ऐन सप्टेंबरमध्येच धोक्याची घंटारत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यातील बोरगाव, सोनुर्ली परिसरातील कपाशीचे उभे पीक करपून वाढून गेल्याची घटना ताजीच असताना नजिकच्या कवठाळा, नांदगाव गावातही कपाशीचे पीक वाळत असल्याने शेतकरी हादरून गेले आहेत. जवळपास ३० ते ३५ एकर जमिनीवरील पीक वाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. व्हायरसच्या प्रभावामुळे पीक वाळत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या कपाशीचे पीक फळावर आले असुन पुढील एक-दोन महिन्यात कापूस वेचणीला सुरूवात होईल. मात्र अचानक आलेल्या या रोगामुळे कपाशीची झाडे वाळायला लागली आहेत. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली. पावसाच्या अनियमीतपणामुळे याआधी दुबार पेरणीचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. अश्यातच तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाची काळजी घेत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक वाचविले; परंतु व्हायरसच्या प्रभावामुळे आता सरसकट पिकच वाळायला लागले आहे. बोरगाव, सोनुर्ली गावातही असाच प्रकार दिसुन आला. तेथे प्रमाण अधिक होते. झाड जागीच वाळून गेल्याने काही शेतकऱ्यांनी जमिन वखरून टाकली आहे, तर काही दुबार पेरणीची तयारी करताना दिसत आहे.पावसाची अनियमितता आणि अश्या रोगांची लागण शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. यातच पिके नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत दिली नाही. औषधांच्या वापरांचा दुष्परिणामसीआयसीआर कमिटीच्या तज्ज्ञांनी बोरगाव, सोनुर्ली परिसरातील पिकांची पाहणी करून कपाशीच्या पिकांची तपासणी केली. यामध्ये औषधांचा अधिक वापर आणि काही औषधे एकत्रित करून फवारल्याने पिकावर हा परिणाम झाल्याचे सीआयसीआर कमिटीचे डायरेक्टर केशव क्रांती यांनी स्पष्ट केले होते. काही औषधांची वापरायची मुदत संपल्यानंतरही औषधे वापरल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशाराकोरपना तालुक्यातील बोरगाव, सोनुर्ली, कवठाळा, एकोडी, इरई, नांदगाव परिसरातील कपाशीचे ५०० ते ६०० एकरवरील पिके व्हायरसच्या प्रभावाने नष्ट झाली. एवढे मोठे नुकसान झाले असताना अद्यापही शासन व प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, रमाकांत मालेकर, नीळकंठ कोरांगे, रवी गोखरे, अनंता गोडे, बंडू राजूरकर, नरेश सातपुते यांनी दिला आहेअहवालाला शेतकऱ्यांचा विरोधसीआयसीआर कमिटीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या प्राथमिक अहवालाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. अनेक वर्षांपासून कपाशीचे पीक घेणारे शेतकरी हा अहवाल मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्या मते गावातील एखादा शेतकरी औषधांचा अधिक वापर किंवा चुकीचा वापर करू शकतो अथवा जुनी औषधेही वापरू शकतो. मात्र गावातील सगळेच शेतकरी असा प्रयोग करणार नाहीत. शेतकऱ्यांचे अश्रू झाले अनावरकवठाळा येथील शेतकरी धोंडुजी बोरकुडे यांचे सहा एकरमध्ये असलेले कपाशीचे उभे पीक जागीच नष्ट झाले. पिकासाठी त्यांनी आतापर्यंत १ ते दीड लाखांचा खर्च केल्याचे सांगितले. हे सांगताना शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते. याचबरोबर कवठाळा येथील भाऊराव आगलावे, गोवर्धन बेरड, मधुकर बेरड, विनोद मेवाळकर, श्यामसुंदर कपाडे, अरविंद ठाकरे, रमेश ठाकरे, रवींद्र ठाकरे, कोंडू वरारकर आदी कवठाळा येथील शेतकऱ्यांसह इरई, एकोडी, नांदगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पिक करपून गेले आहे.त्वरित मदत द्या - वामनराव चटपबोरगाव, सोनुर्ली परिसरातील पिकांची वार्ता कळताच शेतकरी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी संपूर्ण परिसर फिरून शेतपिकाची पाहणी केली. सदर परिस्थितीची माहिती त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना दिली. शेतकऱ्यांसह जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.