शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

शाळाबाह्य मुलींना मिळणार पालक

By admin | Updated: February 7, 2015 23:20 IST

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत.

रवी जवळे - चंद्रपूरसावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत. या सावित्रीच्या लेकींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने ‘लेक शिकवा’ अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शिक्षण विभागाने आणली आहे. आता हे अभियान आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाने आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला दहा शाळाबाह्य मुलींचे पालकत्व मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्वातंत्रपूर्व काळात मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने बघितले जात नव्हते. जणू ‘चूल आणि मूल’ यासाठीच मुलींचा जन्म असावा, अशी प्रथाच रुढ झाली होती. त्यामुळे मुलींना शिकविण्याकडे पालकांचा कल दिसून येत नव्हता. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळच हाती घेतली. प्रारंभी या चळवळीला काही समाजकंटकांनी विरोध केला. मात्र पुढे ही चळवळ यशस्वी झाली आणि मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही काम करीत आहेत. महिलांनी शिक्षणात प्रगती केली, हे सर्वमान्य असले तरी अनेक मुली आताही शाळाबाह्य जीवन जगत आहेत, हेदेखील मान्य करावे लागेल. शिक्षण विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात अजूनही ५३ हजार मुली शाळाबाह्य आहेत. प्रत्यक्षात हा आकडा लाखोत असावा. त्यामुळे या शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन व शालेय शिक्षण विभाग जोरदार प्रयत्न करीत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून विविध घटकातील शाळाबाह्य मुुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. या अभियानाला यशही लाभत असून आतापर्यंत नियमित गैरहजर असलेल्या राज्यभरातील ६५ हजार मुली दररोज शाळेत येऊ लागल्या आहेत. असे असतानाही अद्याप राज्यातील ५३ हजार मुली शाळाबाह्यच आहेत. त्यामुळे या अभियानात आणखी सकारात्मक बदल करून घेत शालेय शिक्षण विभागाने आता ‘शैक्षणिक पालक’ ही योजना पुढे आणली आहे. अजूनही शाळाबाह्य असलेल्या या सावित्रीच्या लेकींना शाळेत आणण्यासाठी त्यांना पालक मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने आपल्याच अधिकाऱ्यांना सोपविली आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख या दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा मुलींचे पालकत्व मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात सतत अनुपस्थित असलेल्या व शाळा सोडून गेलेल्या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे.