शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलींना मिळणार पालक

By admin | Updated: February 7, 2015 23:20 IST

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत.

रवी जवळे - चंद्रपूरसावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत. या सावित्रीच्या लेकींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने ‘लेक शिकवा’ अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शिक्षण विभागाने आणली आहे. आता हे अभियान आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाने आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला दहा शाळाबाह्य मुलींचे पालकत्व मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्वातंत्रपूर्व काळात मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने बघितले जात नव्हते. जणू ‘चूल आणि मूल’ यासाठीच मुलींचा जन्म असावा, अशी प्रथाच रुढ झाली होती. त्यामुळे मुलींना शिकविण्याकडे पालकांचा कल दिसून येत नव्हता. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळच हाती घेतली. प्रारंभी या चळवळीला काही समाजकंटकांनी विरोध केला. मात्र पुढे ही चळवळ यशस्वी झाली आणि मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही काम करीत आहेत. महिलांनी शिक्षणात प्रगती केली, हे सर्वमान्य असले तरी अनेक मुली आताही शाळाबाह्य जीवन जगत आहेत, हेदेखील मान्य करावे लागेल. शिक्षण विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात अजूनही ५३ हजार मुली शाळाबाह्य आहेत. प्रत्यक्षात हा आकडा लाखोत असावा. त्यामुळे या शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन व शालेय शिक्षण विभाग जोरदार प्रयत्न करीत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून विविध घटकातील शाळाबाह्य मुुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. या अभियानाला यशही लाभत असून आतापर्यंत नियमित गैरहजर असलेल्या राज्यभरातील ६५ हजार मुली दररोज शाळेत येऊ लागल्या आहेत. असे असतानाही अद्याप राज्यातील ५३ हजार मुली शाळाबाह्यच आहेत. त्यामुळे या अभियानात आणखी सकारात्मक बदल करून घेत शालेय शिक्षण विभागाने आता ‘शैक्षणिक पालक’ ही योजना पुढे आणली आहे. अजूनही शाळाबाह्य असलेल्या या सावित्रीच्या लेकींना शाळेत आणण्यासाठी त्यांना पालक मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने आपल्याच अधिकाऱ्यांना सोपविली आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख या दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा मुलींचे पालकत्व मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात सतत अनुपस्थित असलेल्या व शाळा सोडून गेलेल्या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे.