शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

शिक्षिकेच्या बदलीसाठी पालक शाळेवर धडकले

By admin | Updated: July 23, 2015 00:43 IST

शिक्षिका वर्गात शिकवत नाही, परीक्षा घेतल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून देत नाही, आदी तक्रारी पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात केल्या.

पालकांचा संताप : मुलांना शाळेत जाण्यास रोखलेवरोरा : शिक्षिका वर्गात शिकवत नाही, परीक्षा घेतल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून देत नाही, आदी तक्रारी पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात केल्या. परंतु शिक्षण विभागाने शिक्षिकेवर कारवाई केली नाही. चालु सत्रामध्ये शिक्षिकेची बदली झाली पाहिजे, या मागणीसाठी बुधवारी भटाळा जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक शाळेवर धडकले. आपल्या पाल्यांना शाळेत जाऊ न दिल्याने शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. वरोरा तालुक्यातील भटाळा गावामध्ये जिल्हा परिषद विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता ५ ते ८ वीचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यालयात भटाळा, कोटबाळा, आसाळा, सालोरी आदी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. इयत्ता ८, ९ व १० वीला शिकविणाऱ्या शिक्षिकेने मागील सत्रात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. परंतु उत्तर पत्रिका तपासून दिल्या नाही. त्यामुळे मागील सत्रात इयत्ता ८ वीचा निकाल निकालाच्या दिवशी जाहिर झाला नाही. त्यामुळे सदर प्रकरण पालकांनी शेगाव पोलीस स्टेशन पर्यंत नेले होते. त्यानंतर सदर शिक्षिकेची बदली करावी अशी मागणी केल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाठविला. परंतु सदर शिक्षिकेवर कारवाई झाली नाही. त्यातच यावर्षीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे मागील वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाकडे सदर शिक्षिकेची बदली करण्याची मागणी लेखी स्वरुपात केली. परंतु शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांनी करीत बुधवारी आपल्या पाल्यांना शाळेत जाण्यापासून रोखून संपात व्यक्त केला. जोपर्यंत या शिक्षिकेची बदली करणार नाही, तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिल्या. त्यामुळे यानंतरही प्रकरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बदलीचे आश्वासनपालक शाळेत धडकल्याची माहिती मिळताच वरोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण जि.प. विद्यालय भटाळा येथे पोहचल.े त्यांनी पालकासोबत चर्चा केली. परंतु पालक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेरीस शिक्षणाधिकारी रमाकांत देशपांडे यांनी भ्रमणध्वनीवर पालकांना सदर शिक्षिकेच्या बदलीचे आश्वासन दिले. त्यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी दिली.