शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पाथरी एफडीसीएमच्या जंगलाला आग

By admin | Updated: April 6, 2015 01:05 IST

वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा परिसरातील जनकापूर ते सामदाकडे जाणाऱ्या वनात मोठ्या

वन्यप्राण्यांना धोका : वनविभाग, एफडीसीएमचे एकमेकांकडे बोटगेवरा: वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा परिसरातील जनकापूर ते सामदाकडे जाणाऱ्या वनात मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. यामध्ये वनविकास महामंडळाची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून परिसरातील वनासह वन्यजीव व जैवविवीधता धोक्यात आली आहे.शासनाच्या वतीने वनविकासाच्या कोट्यावधीच्या योजना वनविकास महामंडळ व नियमित वनविभागामार्फत ग्रामसहभागातून राबविल्या जातात. यासाठी महत्त्वाची भूमिका या विभागांची असते. परंतु वनविकास महामंडळ व वनविभाग यांचे आपापसात सूत जुळत नाही. त्यामुळे कामे प्रभावित होत असल्याने अशाप्रकारच्या धोक्यातून जैवविवीधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांपासून जनकापूर ते सामदा मार्गावरील तीन ते चार किमी अंतरातील जंगल परिसरात मोठा धूर निघताना दिसला. प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता जंगलाला आग लागल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित विभागाला भ्रमणध्वनीवरुन सूचना दिली. परंतु संबंधित विभाग ते आपले क्षेत्र नसल्याचे सांगतात. आता वनविकास महामंडळ व वनविभाग हे परस्पर दोन दिशेने चालणारे विभाग असल्याने अशा घटनाबाबत कुणीही दखल घेण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचेच दिसून येत आहे. आगीमुळे वन्यजीव धोक्यात आले आहे. शिवाय सर्व कृत्रिम पाणवठेही शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. त्यामुळे आगीच्या उष्णतेची दाहकता व उन्हाळ्याच्या उन्हाचा तडाखा वन्यप्राण्यांसाठी त्रासाचा ठरत आहे. (वार्ताहर)