शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

पळसगाव तोरगाव राज्य महामार्गाने सात गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST

घनश्याम नवघडे फोटो नागभीड : पळसगाव - तोरगाव या नवनिर्मित राज्यमहामार्गाने महामार्गात येणारी नागभीड तालुक्यातील सात गावे प्रभावित होणार ...

घनश्याम नवघडे

फोटो

नागभीड : पळसगाव - तोरगाव या नवनिर्मित राज्यमहामार्गाने महामार्गात येणारी नागभीड तालुक्यातील सात गावे प्रभावित होणार आहेत. यातील अतिप्रभावित गावांसाठी बायपास मार्ग अतिशय आवश्यक आहे. नाही तर मार्गात येणाºया या गावातील घरे तुटणार आहेत.

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील जीवनापूर, उश्राळमेंढा, बागलमेंढा, मिंथूर, पारडी (ठवरे), किरमिटी आणि पान्होळी या गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला आहे.

हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील या सात गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असलेली घरे पडणार असल्याची भीती गावकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. गावाच्या बाहेरील रस्ता डांबराचा राहणार असून गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा राहणार आहे. रस्त्याची रूंदी सात मीटर राहणार असल्याची माहिती आहे. जुना रस्ता पाऊणे चार मीटर रूंदीचा असल्याने गावातील अधिकाधिक घरे तुटण्याची शक्यता आहे.

बॉक्स

गावरस्ता लक्षात घेऊन उभारली घरे

गावकºयांनी अतिशय मेहनतीने आणि पै पैसा जमा करून आपली घरे उभारली आहेत. घर हे त्यांचे स्वप्न आहे. उल्लेखनीय बाब ही की गावकºयांनी ही घरे त्यावेळी गावातील गावरस्ता लक्षात घेऊन उभारली आहेत. येथून कधी राज्य महामार्ग जाईल, अशी कल्पनाही कधी गावकºयांनी केली नव्हती. त्यांना राज्य महामार्गाची कल्पना असती तर कदाचित रस्त्याच्या बाजूने जागा सोडून घराची उभारणी केली असती. गावातील घरांना नुकसान पोचू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एकतर बायपास रस्त्याची मागणी रेटून धरावी नाही तर रस्त्याची रूंदी ''''जैसे थे'''' ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गावकºयांची मागणी आहे.