शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

हंगामपूर्व मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:16 IST

जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली.

ठळक मुद्देखरीप हंगामाची पूर्वतयारी : कृषी विभागही तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. बोंडअळीच्या आक्रमणाने कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला. कर्जमाफीचा फायदाही झाला नाही. तरीही आगामी वर्षाची तजवीज करण्यासाठी बळीराजाने खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरू केली आहे. निसर्ग आतातरी साथ देणार म्हणून बळीराजा शेतीच्या मशागतीला लागला आहे.जिल्ह्यात चार लाखाहून अधिक हेक्टरवर खरीप पिकाची लागवड केली जाते. यामध्ये भात, कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठे आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्ट्यातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकऱ्यावर अरिष्ट ओढावले होते.शेतकºयांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो. परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकºयांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही. यामुळेच उत्तम शेती व्यवसाय अशी एकेकाळची घोषणा आता बेकार शेती व्यवसाय अशी झाली आहे.जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. एकूण खरिपाचे पेरणी क्षेत्र चार लाखांहून अधिक हेक्टर असले तरी मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. निसर्गाचे जलचक्रच बिघडले आहे. यामुळेच शेती पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तरीही शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे.यंदा शेतकऱ्यांना आशायावर्षी उन्हाळा अतिशय कडक जात आहे. हवामान खात्याने पाऊसही दमदार होईल, असा अंदाज वर्तविला आहे. २९ मे रोजी मान्सून केरळात धडकणार असल्याची खूशखबर हवामान खात्याने दिली आहे. याचाच अर्थ दोन दिवस आधी म्हणजे ५ जूनलाच मान्सून राज्यात सक्रिय होईल, असाही अंदाज आहे. यामुळे बळीराजा सध्यातरी आनंदात आहे. यंदा पाऊस बरा झाला तर मागील वर्षीचे नुकसानही भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.बोंडअळीच्या नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षाशेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कृषी विभागाने कापूस पिकांवर आलेल्या बोंडअळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. नुकसान भरपाई देण्याची शासनाने घोषणा केली. आज न उद्या नुकसान भरपाई मिळणार म्हणून शेतकºयांना आशा होती. बी-बियाणे व खताचे नियोजन करण्यास उपयोगी पडणार म्हणून शेतकरी सुखावला. मात्र शेतीच्या मशागतीला लागूनही बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.बल्लारपुरात कपाशीचा पेरा वाढलाबल्लारपूर तालुक्यात दोन वर्षापूर्वी एकूण खरीप हंगामातील ९ हजार ३७९ हेक्टरपैकी तब्बल पाच हजार ४५६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली जात होती. याकडे शेतकºयांनी पाठ फिरवून कापूस पिकाला पसंती दिली. मात्र शासनाने कापूस पिकाला पीक विमा योजनेतून हद्दपार केल्याने मोठ्या तालुक्यातील शेतकºयांना फटका बसला. बल्लारपूर तालुक्यात भात पिकाचे एकूण पेरणी क्षेत्र २ हजार ५७६ हेक्टर इतके आहे.