शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर ठरतोय कोरोना रुग्णांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाही स्टेरॉईड, सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाही स्टेरॉईड, सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कर्करोगाला आमंत्रण देणारा असल्याचे कोरोना राज्य टास्क पोर्स समितीने नुकताच दिला. त्यामुळे सौम्य व लक्षणे नसणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी शक्यतो, अशा चाचण्या टाळण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही रुग्ण एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजीत गर्दी करीत आहेत. ही चाचणी केल्यास रुग्णाच्या छातीत किती प्रमाणात संसर्ग झाला, याची माहिती मिळते. मात्र, सौम्य लक्षणे असली तरी सीटी स्कॅन करणे घातक आहे. या चाचणीमुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासारखे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास चंद्रपूर शहरातील काही रुग्ण खासगी डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना काही डॉक्टर एचआरसीटी चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे पॅथाॅलॉजीमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते.

एक सीटी स्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे

एक सीटी स्कॅन काढणे म्हणजे रुग्णाच्या छातीचे ८० ते १४० एक्स-रे काढण्यासारखे आहे. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्याच मर्जीने सीटी स्कॅन काढणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. रेडिएशनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवा अवस्थेत उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आल्यास उतारवयात धोका वाढतो.

११०० सीटी स्कॅन होतात दररोज

जिल्ह्यात दररोज ११०० सीटी स्कॅन होत असल्याचा अंदाज आहे. चंद्रपूर शहरात चार हॉस्पिटलला सीटी स्कॅनसाठी मान्यता आली. रुग्ण वाढल्याने काही हॉस्पिटलमध्ये सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी होते. १६ स्लाईडखालील सीटी स्कॅनसाठी २००० रुपये, १६ ते ६४ स्लाईड सीटी स्कॅनला २५०० तर ६५ पेक्षा अधिक स्लाईड सीटी स्कॅनसाठी ३००० रुपये शुल्क आकारले जात आहे.

आजारांचा धोका

युवा अवस्थेत उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना उतारवयात कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करणे धोकादायक आहे. कोविडची सामान्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही रुग्णांचा आजार गृहविलगीकरणात राहून उपचार घेतल्यावरही बरा होऊ शकतो, अशी माहिती जि. प. आरोग्य विभागाने दिली.

दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर अशाप्रकारची चाचणी उपयुक्त ठरू शकते.