शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

कोरोना संसर्गाचा उद्रेक हाताबाहेर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ९५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २७ हजार २६० ...

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ९५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २७ हजार २६० झाली आहे. सध्या चार हजार २२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ९५ हजार ५०८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ५८ हजार ६६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २४ तासात ३२४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. आज मृत झालेल्यामध्ये चिमूर येथील ५२ वर्षीय पुरूष व वरोरा येथील ७८ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महिला व ५९ वर्षीय महिला, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरूष, दुर्गापूर चंद्रपूर येथील ४९ वर्षीय पुरूष व ६४ वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील ६८ वर्षीय महिला, ब्रह्मपूरी येथील ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४२२, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली २०, यवतमाळ १९, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्वांनी जवळच्या केंद्रावरून लस घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय रूग्ण

चंद्रपूर मनपा क्षेत्र १९७

चंद्रपूर तालुका ४०

बल्लारपूर ६४

भद्रावती ३५

ब्रह्मपुरी ४७

नागभीड ३०

सिंदेवाही २२

मूल १९

सावली १६

गोंडपिपरी ०६

राजूरा २४

चिमूर १०१

वरोरा ११८

कोरपना ५८

जिवती ०१

अन्य ०७