शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना रुजू होण्याचे आदेश

By admin | Updated: December 8, 2014 22:33 IST

मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या,

चंद्रपूर: मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या, अन्यथा कडक कार्यवाहीला सामोरे जा, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील काही अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे शालेय पोषण आहार योजनेला ग्रहण लागले. शाळांमधून विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळू लागले. अल्प मानधनावर स्वयंपाकी म्हणून गरजु महिलांना कामावर ठेवण्यात आले. मात्र, काही ठिकाणी आपल्याच मर्जीतील महिलांना कामावर ठेवण्यासाठी खटाटोप झाले. पुढे हा प्रकार वाढतच गेला. दरम्यानच्या काळात, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पोषण आहार योजना चालवण्याचे शासनाने धोरण आणले. याचा फायदा घेत काहींनी पूर्वीपासून कामावर असलेल्या महिलांना डावलून आपल्या मर्जीतील महिलांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अन्यायग्रस्त महिलांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारुन जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु केले. उपोषणाच्या सहाव्या दिवशी चार महिलांची प्रकृती खालावल्यामुळे आयटकचे जिल्हा अध्यक्ष प्रा. कन्नाके, उपाध्यक्ष संतोष दास, विनोद झोडगे, अजय रेड्डी यांनी शिक्षणाधिकारी देशपांडे यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून २९ शाळांतील ४६ महिलांना मानधनासह कामावर रूजू करून घ्यावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)