शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडले

By admin | Updated: June 13, 2014 00:03 IST

वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे उन्हाळा आला की, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दरम्यान, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडण्यात

खांबाडा : वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे उन्हाळा आला की, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दरम्यान, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने पोथरा नदी वाहू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.दरवर्षी उन्हाळा आला की महिलांची पाण्यासाठी पायपीट होते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने याठिकाणी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षी वाढत्या लोकसंख्येमुळे व गावातील चढउतार भागामुळे पाण्याची कमतरता भासत असते. दरवर्षी उन्हाळा आला की, या परिस्थितीवर कशी मात करावी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडतो. दरवर्षीच महिला ग्रामपंचायतीवर पाणी प्रश्न घेऊन एकजुटीने धडकतात. परंतु ग्रामपंचायतीने पाणी समस्या निपटून काढण्यासाठी आजपर्यंत ठोस असे कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागते.अखेर महिलांनी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेतली. कारण आजपर्यंत या समितीने महिलांच्या प्रश्नाकडे सतत लक्ष देऊन महिलांना न्याय मिळवून दिले आहेत. या अगोदर तंटामुक्त समितीने पुरस्काराच्या रकमेतून दोन वॉर्डामध्ये हातपंप देऊन पाणी समस्या सोडविली आहे. तसेच सन २००९ मध्ये तंटामुक्त गाव समितीच्या पाठपुराव्याने चंद्रपुरचे तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी संबंधित विभागाला संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लाल नाला प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार कोरडी पडलेली पोथरा नदी वाहू लागली होती. बंद पडलेली नळयोजना पुर्ववत सुरू झाली होती. या बाबीची जाण ठेवून महिला समितीने पाणी प्रश्नाबद्दल चर्चा केली. त्यानंतर समितीने पाठपुरावा केल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी लाल नाला प्रकल्पातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)