शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मंदिराचे दार आता तरी उघडा हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने काही निर्बंध लादले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटल्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने काही निर्बंध लादले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटल्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू झाले असून नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मंदिर अद्यापही बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रावण महिना सणासुदीचा असतो. या महिन्यात तरी मंदिरे सुरू होतील, अशी आशा सर्वांनाच लागली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बहुतांश निर्बंध राज्य सरकारने हटविले आहेत. आता हाॅटेल, दुकाने, बससेवा सर्व सुरू झाले आहे. बाजारपेठांमध्येही मोठ्या संख्येने गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळून मंदिर, प्रार्थना स्थळे सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवल्या जात होत्या. १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. श्रावण महिन्यात विविध सणांची रेलचेल असते. विशेषत: श्रावण सोमवारी बहुतांश जण पूजाअर्चना करतात. मात्र मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही मंदिर बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

भाविकांची निराशा

मागील वर्षी मंदिर बंद होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिरांवर अनेकांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. फुले व इतर धार्मिक विधीसाठी साहित्य विकणारे दुकानदार या सर्वांचा व्यवसाय मंदिरावर अवलंबून आहे. मात्र मंदिर बंद असल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

बाॅक्स

महाकाली मंदिरासह सर्वच बंद

जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या महाकाली मंदिरासह प्रत्येक मंदिर सद्यस्थितीत बंद आहे. विशेष म्हणजे, महाकाली देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्राही यावर्षी भरली नाही. त्यातच मंदिरही बंद असल्यामुळे भाविकांना मंदिराचे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.

बाॅक्स

अंचलेश्वर मंदिरही पडले ओस

चंद्रपूर येथील अंचलेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते. बेलपात्र वाहून भाविक तासन् तास मंदिरामध्ये घालवित होते.

मात्र आता मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना घरातून पूजाअर्चना करावी लागत आहे. पूजेच्या साहित्यातून होणारी आर्थिक उलाढालही जवळपास थांबली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान होत आहे.