शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

मंदिराचे दार आता तरी उघडा हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने काही निर्बंध लादले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटल्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने काही निर्बंध लादले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटल्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू झाले असून नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मंदिर अद्यापही बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रावण महिना सणासुदीचा असतो. या महिन्यात तरी मंदिरे सुरू होतील, अशी आशा सर्वांनाच लागली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बहुतांश निर्बंध राज्य सरकारने हटविले आहेत. आता हाॅटेल, दुकाने, बससेवा सर्व सुरू झाले आहे. बाजारपेठांमध्येही मोठ्या संख्येने गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळून मंदिर, प्रार्थना स्थळे सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवल्या जात होत्या. १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. श्रावण महिन्यात विविध सणांची रेलचेल असते. विशेषत: श्रावण सोमवारी बहुतांश जण पूजाअर्चना करतात. मात्र मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही मंदिर बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

भाविकांची निराशा

मागील वर्षी मंदिर बंद होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिरांवर अनेकांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. फुले व इतर धार्मिक विधीसाठी साहित्य विकणारे दुकानदार या सर्वांचा व्यवसाय मंदिरावर अवलंबून आहे. मात्र मंदिर बंद असल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

बाॅक्स

महाकाली मंदिरासह सर्वच बंद

जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या महाकाली मंदिरासह प्रत्येक मंदिर सद्यस्थितीत बंद आहे. विशेष म्हणजे, महाकाली देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्राही यावर्षी भरली नाही. त्यातच मंदिरही बंद असल्यामुळे भाविकांना मंदिराचे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.

बाॅक्स

अंचलेश्वर मंदिरही पडले ओस

चंद्रपूर येथील अंचलेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते. बेलपात्र वाहून भाविक तासन् तास मंदिरामध्ये घालवित होते.

मात्र आता मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना घरातून पूजाअर्चना करावी लागत आहे. पूजेच्या साहित्यातून होणारी आर्थिक उलाढालही जवळपास थांबली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान होत आहे.