शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

केवळ दाखल्यांसाठी करावी लागते २५ किमीची पायपीट

By admin | Updated: September 13, 2015 00:48 IST

राजुरा तालुक्याचे विभाजन करुन शासनाने २००२ मध्ये जिवती तालुक्याची निर्मिती केली. राजुरा व कोरपना तालुक्यातील ८४ गावे जिवती तालुक्यात समाविष्ट करण्यात आले.

गणेरी गावाचा बिकट प्रश्न : गाव एका तालुक्यात; ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यातफारुख शेख  पाटणराजुरा तालुक्याचे विभाजन करुन शासनाने २००२ मध्ये जिवती तालुक्याची निर्मिती केली. राजुरा व कोरपना तालुक्यातील ८४ गावे जिवती तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. विविध समस्यांनी ग्रासलेला जिवती तालुका नेहमीच चर्चेत असतो. तालुका निर्मितीला एका तपाचा कालावधी लोटला असला तरी येथील जनतेच्या समस्या संपलेल्या नाहीत.तेलंगणा सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील वादग्रस्त साडेबारा गावांचा प्रश्न उभा ठाकला असतानाच एक नवीन बाब समोर आली आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात वसलेले गणेरी हे गाव विचित्र समस्येने ग्रासले आहे. या गावाला शैक्षणिक सुविधा म्हणून जिवती तालुक्यातील पंचायत समिती जिवती अंतर्गत १ ते चार वर्ग असलेली जि.प.ची शाळा आहे. सदर गाव राजुरा तालुक्यातील कावळगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येत असून शासकीय योजना गावापासून कोसोदूर आहे. ३० घरांची वस्ती असलेल्या गावात दीडशेच्या आसपास लोकसंख्या असून आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.गावात एकही शौचालय, सिमेंट रस्ता, सिमेंट नाली, अंगणवाडीसाठी इमारत नाही. एक हातपंप असून तोही दोन महिन्यांपासून बंद आहे. पिण्याचे पाणी गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या विहीरवरुन आणावे लागते. ब्लिचिंग पावडर तर गावकऱ्यांना माहितच नाही. दूषित पाणी पिल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील पथदिवे सणासुदीलाच पेटतात. विजेचा लपंडाव व आरोग्याची समस्या गावकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक कुठे व कशी होते हे गावकऱ्यांना माहितच नाही. ग्रामसेवक केवळ घरपावती वसुलीसाठीच येत असल्याची माहिती ८० वर्षीय वृद्ध सखाहरी वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते उघडण्यास गेले असता मतदान ओळखपत्रावरील पुनागुडा ग्रामपंचायतीचा व रहिवासी दाखल्यावरील कावळगोंदी ग्रामपंचायत राजुरा तालुक्याचा उल्लेख असल्याने बँकेत खाते उघडण्यास कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत असते. अशी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखविली. गणेरी गावापासून पाच किमी अंतरावर असलेली पुनगुडा ग्रामपंचायत जिवती पंचायत समिती अंतर्गत आहे व गणेरी गावावरुन पुढे तीन किमी अंतरावरील भाईपठावर हे गाव पुनगुडा ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. मात्र गणेरी हे एकच गाव राजुरा तालुक्यातील कावळगोंदी ग्रामपंचायतीत समाविष्ठ असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावा लागत आहे. याकडे शासनाचे व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.