शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी विद्यार्थ्यांविना नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र सर्व ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी विद्यार्थ्यांविना नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणारे मोफत पाठ्यपुस्तक अद्यापही विद्यार्थ्यांच्या हातात पडले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय ऑनलाइन शाळा करावी लागत आहे. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

विशेष म्हणजे, दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात होती.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी शिक्षण विभाग उन्हाळ्याच्या सुट्यांच्या दिवसापासूनच नियोजन करतात. यावर्षीही बालभारतीकडे १ लाख ५७ हजार ५७८ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची नोंदणी केली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे यावर्षी पुस्तकांची छपाई बालभारतीकडून थांबली होती. परिणामी शाळा सुरू होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात अजूनही पुस्तक पडले नाही. दरवर्षी नवीन पुस्तकांची विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. यावर्षी ना शाळा, ना पुस्तक अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय विद्यार्थी

चंद्रपूर २०,७७६

भद्रावती ८५७२

वरोरा १३,५४०

चिमूर १३,९९४

ब्रह्मपुरी १४,६१३

नागभीड ११,५१८

सिंदेवाही १०,३४४

मूल १०,६१०

सावली ९४३२

पोंभुर्णा ४००४

गोंडपिपरी ७७७२

बल्लारपूर ६१७७

राजुरा १०,०६२

कोरपना ९५८३

जिवती ७५८१

एकूण-१,५७,५७८

--

सहा हजार विद्यार्थ्यांनीच केली पुस्तके परत

यावर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या कोणत्याच वर्गाचा अभ्यासक्रम बदलला नाही. त्यातच मागील वर्षी शाळाही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे मागील वर्षीचे पुस्तके चांगल्या स्थितीत होते. या पुस्तकांचा पुनर्वापर होऊ शकतो यासाठी जिल्ह्यातील ६ हजार पालकांनी आपल्याकडील पुस्तके शाळांना परत केली आहेत. अन्य पालकांनीही वापरलेली पुस्तके शाळांना परत केल्यास दरवर्षी होणारा खर्च काही प्रमाणात का होईना टाळता येईल.

बाॅक्स

पुस्तक नाही, अभ्यास कसा करायचा?

दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात होती. यावर्षी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होऊन पंंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके नाही. केवळ ऑनलाइन अभ्याक्रमावर भर दिला जात आहे. मात्र पुस्तकच नाही तर अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न सध्या विद्यार्थी उपस्थिती करीत आहे. विशेष म्हणजे, सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी या अभ्यासक्रमापासून विद्यार्थी वंचित आहेत.

कोट

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या लक्षात घेऊन बालभारतीकडे पुस्तकांची नोंदणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सध्या पुस्तके येत आहे. काही पुस्तके आली असून, अन्य विषयांचेही पुस्तक लवकरच प्राप्त होईल.

- दीपेंद्र लोखंडे

शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प., चंद्रपूर