शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

जिल्ह्यातील ४२३ गावांत एक गाव - एक गणपती

By admin | Updated: September 11, 2016 00:43 IST

भक्तीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र यावे, त्यातून चांगल्या विचारांची आदानप्रदान व्हावी,...

लोकमान्य टिळकांच्या उद्देशाला अनेक गावांत हरताळगेल्या वर्षीपेक्षा लक्षणीय वाढचंद्रपूर : भक्तीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र यावे, त्यातून चांगल्या विचारांची आदानप्रदान व्हावी, या मूळ हेतूने लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. परंतु अलिकडील काही वर्षांत गावागावांत टिळकांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. गावातील सलोखा कायम रहावा, यासाठी एक गाव एक गणपतीची संकल्पना पुढे आली. मात्र या संकल्पनेलाही अनेक गावांमध्ये खो देण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील एक ‘गाव एक गणपती’ स्थापनेच्या आकडेवारीवरून ही बाब लक्षात येते. यावर्षी जिल्ह्यातील केवळ ४२३ गावांत एक गाव-एक गणपतीची संकल्पना प्रत्यक्षात साकरण्यात आल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक गाव - एक गणपतीच्या या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्ह्यात एकूण चंद्रपूरसह १५ तालुके आहेत. या तालुक्यामध्ये एकुण ४२३ ठिकाणी एक गाव-एक गणपती ही संकल्पना अमलात आणली. मागील वर्षी जिल्ह्याभरात फक्त १४४ गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एक गाव-एक गणपती या मोहीमेसाठी जनजागृती करण्यात आली. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यातील ४२३ गावांत एक गाव - एक गणपतीची स्थापना करण्यात आली. मात्र चिमूर तालुक्यातील फक्त ताळोधी नाईक या एकाच गावात एक गाव - एक गणपती स्थापन करण्यात आला. तर भद्रावती ४१, राजुरा १५, सावली १९, सिंदेवाही १६, कोरपना ३२, वरोरा ३३, ब्रह्मपुरी १७ यासह आदी तालुक्यात एकुण ४२३ एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात एक गाव एक गणपतीची संकल्पना मुळात चांगली आहे. त्यासाठी गावकऱ्यांना पोलिसांकडूनही प्रोत्साहन दिले जाते. मात्र अनेक गावांतून प्रतिसादच दिला जात नसल्याचा अनुभव येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. गावगाड्याच्या राजकारणात एका गावाची चार शकलं पडली. मतभेदातून गटबाजी उफाळली. अनेक गावांमध्ये गटाची ताकद दाखविण्यासाठी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे एका गावात चार ते पाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. त्यातून मग या सार्वजनिक मंडळांमध्ये स्पर्धा सुरू होते. यातून गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होण्याऐवजी त्यांच्या कटुताच अधिक निर्माण होते. अनेक मंडळातील कार्यकर्त्यांना तर गणेशोत्सवाचा इतिहासदेखील माहित नसतो. एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करायचे. लोकांकडून वर्गणी गोळा करायची. त्या पैशातून मग उत्सव साजरा करायचा, अशीच परंपरा अलिकडे रुढ झाली आहे. हे चित्र खरे तर आता बदलायला हवे. गणेशोत्सव साजरा करताना त्यातून समाजप्रबोधन व्हावे, अशी अपेक्षा असते. मात्र तसे चित्र फार दिसत नाही. गावाच्या एकोप्यासाठी गणेशोत्सव हे चांगले माध्यम आहे. मात्र या उत्सवातही अलिकडे राजकारण शिरले आहे. (नगर प्रतिनिधी)