शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

एक किंवा दोन.. बस्स !

By admin | Updated: September 16, 2014 23:37 IST

काही वर्षापूर्वी कुटुंबनियोजनाचे महत्त्व नागरिकांना फारसे कळले नव्हते. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना शासनाला सुरु

११ हजारावर कुटुंबीयांनी केली नसबंदी : आरोग्य विभागाचे यशचंद्रपूर : काही वर्षापूर्वी कुटुंबनियोजनाचे महत्त्व नागरिकांना फारसे कळले नव्हते. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना शासनाला सुरु कराव्या लागल्या. तरीही याचा फारसा फायदा जाणवत नव्हता. अनेकवेळा शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनियोजनाचे ‘टॉर्गेट’ देण्यात येत होते. आता मात्र परिस्थिती बदली आहे. वाढती बेरोजगारी, महागाईमुळे तसेच तंत्रज्ञानाने जनजागृती झाली आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिक स्वत:हून समोर येत आहे. यामुळेच मागील वर्षी जिल्ह्यात ११ हजार ९०८ महिला, पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.जिल्ह्यातील ९ हजार ८७६ कुटुंबीयांनी एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली आहे. तर, चालु वर्षामधील पहिल्या पाच महिन्यात १ हजार ९९ कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया आटोपल्या आहे. यातील ९८० जणांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील आहे. तर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.सन २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला शासनाने ११ हजार ६०० कुटुंबीयांंनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट दिले होते. आरोग्य विभागाने १०३ टक्के टॉर्गेट पूर्ण केले आहे. चालू वर्षामध्ये २०१४-१५ मध्ये ११ हजार ७०४ कुटुंब नियोजन पूर्ण करण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे. प्रथम पाच महिन्यामध्ये एक हजार १९६ जणांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे. तर उर्वरित टार्गेट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याची निर्धार विभागाने व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)