शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

आमदाराच्या आक्रमकतेने अधिकारी हादरले

By admin | Updated: August 28, 2016 00:40 IST

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

आढावा बैठक : नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्यसिंदेवाही : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मागील आठ महिन्यांपासून जनतेच्या समस्या व तक्रारींचे पत्र आणि दूरध्वनीवरून सतत येत असल्याने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सिंदेवाही विभागातल्या पाचही आरोग्य केंद्रात डॉक्टर व औषधाची कमतरता असल्याने रुग्णाला उपचार बरोबर मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टर हे खासगी औषधी दुकानातून औषधी घेण्याचा सल्ला देतात. रुग्णाला पाहण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे त्वरित उपाययोजना करून समस्या मिटविण्याचे आदेश देण्यात आले.पंचायत विभागाशी संलग्न संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिक अवगत असल्याचे दिसते. ग्रामसेवकाच्या माध्यमातून गावात शासनाच्या योजना राबविल्या जातात. पण काही महिन्यांपासून पं.स. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गावात योजनेचा अभाव दिसत असल्याने विकास थांबला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना या सर्व समस्यांबद्दल अवगत करण्यात आले.या व्यतिरिक्त एसटी महामंडळ विद्यार्थी पासेस व लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याबाबत चर्चा केली. तहसील विभाग, पोलीस विभाग, वन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, रोपवन लागवड अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींशी दीर्घ चर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले. ही चर्चा करीत असताना नागरिकांसाठी आ. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना सोडले नाही. त्यांना आक्रमकतेने प्रश्न विचारून उत्तर मागायचे. समाधान न झाल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करीत असताना अधिकारी मात्र धसकावीत होते.हे सर्व दृष्य पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांना १५ वर्षापूर्वीचे आमदार वडेट्टीवार असल्याचा भास होत होता. त्यावेळी ते शिवसेनेसोबत होते हे विशेष! (प्रतिनिधी)तक्रारींचा पाऊसविद्युत विभागाच्या अभियंत्याविरोधात तक्रारीचा पाऊस पाहून आमदार संतप्त झाले. त्यांनी वरिष्ठ अभियंत्याला दूरध्वनी करून नागरिकांच्या समस्याबद्दल अवगत केले. महावितरण दिवसरात्र भारनियमन करीत असल्याने शेतकरी मोटरपंपाद्वारे धानाला पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे धान मरणावस्थेला पोहोचले आहेत. तालुक्याची विद्युत व्यवस्था त्वरित योग्य पद्धतीने करावी, असा आदेश त्यांनी दिला.