शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

ओबीसी जनगणनेसाठी ‘तो’ करतोय गावागावात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

राजुरा येथील दिनेश पांडुरंग पारखी (४०) असे या ध्येयवेडया माणसाचे नाव आहे. मराठा सेवा संघाचा तो सक्रिय कार्यकर्ता असून ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी चालविलेली धडपड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाची जनगणना झाली नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा फारसा लाभ होताना दिसत नाही.

ठळक मुद्दे५५ गावे घातली पालथी : ध्येयवेड्या माणसाने घेतला जनजागृतीचा वसा

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : समाजात काही माणसे असे आहेत की ते स्वत:चा विचार न करता कायम समाजाचा विचार करीत असतात. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्दात्त हेतूने झपाटलेल्या एका ध्येयवेड्या माणसाने दिवसरात्र परिश्रम घेत ओबीसी जनगणनेसाठी एकाकी झुंज देत आहे.राजुरा येथील दिनेश पांडुरंग पारखी (४०) असे या ध्येयवेडया माणसाचे नाव आहे. मराठा सेवा संघाचा तो सक्रिय कार्यकर्ता असून ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी चालविलेली धडपड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाची जनगणना झाली नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा फारसा लाभ होताना दिसत नाही. त्यासाठी ओबीसींची जनगणना व्हावी, यासाठी दिनेश पारखी हे गावागावात जावून जनजागृती करण्याचे काम करीत आहे. त्यांनी राजुरा तालुका पूर्णत: पिंजून काढला असून आजपर्यंत त्यांनी ५५ गावे पालथी घालून नागरिकांमध्ये ओबीसी जनगणनेविषयी जनजागृती केली आहे.भारतात १९३१ पासून ओबीसींची जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाला शासनाच्या विविध योजनांमधून वगळण्यात आले आहे. हा ओबीसी समाजावर केला जाणारा अन्याय असून २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या जनगणननेत ओबीसींची जनगणना करावी, यासाठी ते आपल्या कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते इतर मागासवर्गीयांची (ओबीसींची) जनगणना व्हावी, यासाठी दिवसरात्र झटत आहे.पंतप्रधान कार्यालयाला सहा हजार पोस्टकार्डओबीसींची जनगणना होण्यासाठी दिनेश पारखी यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला सहा हजार पोस्टकार्ड पाठविले आहेत. यासोबतच ओबीसी जनजागृती अभियान, एकदिवसीय धरणे आंदोलन, ओबीसी परिषद, ओबीसी जनगणना आंदोलन व समाज प्रबोधन करून समाजजागृतीची चळवळ अधिकच समृद्ध केली आहे. यासाठी त्यांनी आपली चळवळ अधिकच तीव्र केली असून त्यांनी आता प्रत्येक घरी जाऊन ‘ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे’ अशा आशयाचे पत्रक घरोघरी दिले आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती