शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

ओबीसी व छोट्या राज्याची चळवळ विकासात्मक

By admin | Updated: June 14, 2017 00:31 IST

ओबीसी समाजबांधवांनी एकत्र येऊन ओबीसी चळवळ उभारावी व त्यातून समाजाची उन्नती साधावी.

महादेव जानकर : चंद्रपूर येथे कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ओबीसी समाजबांधवांनी एकत्र येऊन ओबीसी चळवळ उभारावी व त्यातून समाजाची उन्नती साधावी. या चळवळी चालवित असताना सरकारशी समायोजन करून घटनादत्त अधिकार मिळवावा. सोबतच लहान राज्य असणे हे समाजाच्या व प्रदेशाच्या उन्नतीसाठी चांगले आहे. लहान राज्यातून विकास साधता येतो, अशी भूमिका पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी येथे मांडली.ना. जानकर यांचा स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयातील ‘श्री-लीला’ सभागृहात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पदाधिकारी, शिक्षक यांनीही केला.ना. जानकर म्हणाले की, त्या काळात शिक्षण महर्षी कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख, श्रीहरी जीवतोडे गुरूजी यांनी महाराष्ट्रात ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविली. त्यामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षण घेऊ शकली. ते आज मोठ्या पदावर आहेत. ओबीसी समाज मोठा आहे, आता तो हळूहळू संघटित होत आहे. या समाजाने चळवळ मजबूत करायला हवी. प्राचार्य ओबीसी निमंत्रक सचिन राजूरकर, माजी प्राचार्य सुधाकर उमाटे, माजी मुख्याध्यापक रावजी चवरे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, विमाशिचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अशोक जीवतोडे, संचालन प्रा. रवी वरारकर व आभार प्रा. महेश यार्दी यांनी मानले.