शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. मात्र या गाड्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही रेल्वे सेवा सुर‌ळीत सुरू झाली नाही. पॅसेंजर बंद असल्यामुळे जवळपासच्या गावांना रेल्वेने प्रवास करणे सध्यातरी बंद आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी असलेली सेवाग्राम एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे येथील प्र‌वाशांना वर्धा येथून विशेष रेल्वे पकडावी लागत आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा; नाही तर पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करीत आहेत.

बॉक्स

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

कोरोना संकटापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे थांबत होत्या आता त्यातील काही मोजक्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहे. विशेष म्हणजे, सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

बाॅक्स

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

नवजीवन

संघमित्रा

दक्षिण

जीटी

तामिलनाडू

तेलंगणा

बंगलोर - निजामुद्दीन

दानापूर - सिकंदराबाद

केरला

विशाखापट्टणम - नवी दिल्ली

यशवंतपूर - निजामुद्दीन

कोट...

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास

कोरोना संकटामुळे नियमित रेल्वे सेवा बंद आहे. यातील काही विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सेवाग्राम, आनंदवन या रेल्वे सुरू करून दिलासा द्यावा.

- श्रीकांत खडसे, चंद्रपूर

कोट

कोरोना संकटापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू होती. त्यामुळे चंद्रपूर तसेच इतर ठिकाणाहून मुंबईला जाणे सोपे होते. मात्र आता ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा येथील स्टेशनवरून मुंबईला जावे लागते. त्यामुळे ही रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक आहे.

- अनुप खुटेमाटे, भद्रावती

००

कोट

कोरोना संकटानंतर पॅसेंजर तसेच इतर एक्स्प्रेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे या पॅसेंजर सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेष ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या स्पेशल ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबवाव्यात किंवा पॅसेंजर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.

- श्रीनिवास सुंचूवार

झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे