शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. मात्र या गाड्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही रेल्वे सेवा सुर‌ळीत सुरू झाली नाही. पॅसेंजर बंद असल्यामुळे जवळपासच्या गावांना रेल्वेने प्रवास करणे सध्यातरी बंद आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी असलेली सेवाग्राम एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे येथील प्र‌वाशांना वर्धा येथून विशेष रेल्वे पकडावी लागत आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा; नाही तर पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करीत आहेत.

बॉक्स

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

कोरोना संकटापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे थांबत होत्या आता त्यातील काही मोजक्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहे. विशेष म्हणजे, सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

बाॅक्स

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

नवजीवन

संघमित्रा

दक्षिण

जीटी

तामिलनाडू

तेलंगणा

बंगलोर - निजामुद्दीन

दानापूर - सिकंदराबाद

केरला

विशाखापट्टणम - नवी दिल्ली

यशवंतपूर - निजामुद्दीन

कोट...

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास

कोरोना संकटामुळे नियमित रेल्वे सेवा बंद आहे. यातील काही विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सेवाग्राम, आनंदवन या रेल्वे सुरू करून दिलासा द्यावा.

- श्रीकांत खडसे, चंद्रपूर

कोट

कोरोना संकटापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू होती. त्यामुळे चंद्रपूर तसेच इतर ठिकाणाहून मुंबईला जाणे सोपे होते. मात्र आता ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा येथील स्टेशनवरून मुंबईला जावे लागते. त्यामुळे ही रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक आहे.

- अनुप खुटेमाटे, भद्रावती

००

कोट

कोरोना संकटानंतर पॅसेंजर तसेच इतर एक्स्प्रेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे या पॅसेंजर सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेष ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या स्पेशल ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबवाव्यात किंवा पॅसेंजर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.

- श्रीनिवास सुंचूवार

झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे