शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

कोर्टातील खटल्यांची संख्या कमी असावी

By admin | Updated: January 19, 2016 00:45 IST

सुदृढ समाजासाठी सामान्य लोकांच्या कोर्टातील खटल्यांची संख्या कमीत कमी असावी. तरच सामाजिक वातावरण चांगले राहील.

एम.व्ही. कुळकर्णी : कायदेविषयक माहितीपर शिबिरचंद्रपूर : सुदृढ समाजासाठी सामान्य लोकांच्या कोर्टातील खटल्यांची संख्या कमीत कमी असावी. तरच सामाजिक वातावरण चांगले राहील. कोणत्याही देशात कोर्टातील खटल्यांची संख्या जास्त असणे सामाजिकदृष्ट्या चांगले नाही, असे मत मुख्य दंडाधिकारी ए.व्ही. कुळकर्णी यांनी व्यक्त केले.सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित कायदेविषयक माहितीपर शिबीरामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मुख्य न्याय दंडाधिकारी ए.व्ही. कुळकर्णी, अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधिश जे.व्ही. गांधे, अधिवक्ता एम.बी. आसरट, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.आर.पी. इंगोले आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना ए.व्ही. कुळकर्णी यांनी समाजातील लोकांचे मन जर सुसंस्कृत असेल आणि प्रत्येकांनी इतरांशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला तर कोर्टापर्यंत जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि समाज चांगल्या दिशेने वाटचाल करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.पी. इंगोले यांनी या कायदेविषयक माहिती शिबिरातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य कायद्याची माहिती असावी. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अधिवक्ता एम.बी. आसरट यांनी बाल न्याय कायदा या विषयावर माहिती विद्यार्थ्यांना दिली. संचालन प्राध्यापिका स्नेहल जाचक यांनी तर आभार प्राध्यापिका माधुरी राखुंडे-पिसे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)