शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

कोरोनामुक्तीचा आकडा बाधितांपेक्षा तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १०७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर ३७७ ...

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १०७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर ३७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नव्याने बाधित होणाऱ्यांचा आकडा आता घसरत असून शनिवारी तर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण तिप्पट होते.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८० हजार ६०० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७२ हजार ९९८ झाली आहे. सध्या सहा हजार २४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार लाख ५३ हजार ९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी तीन लाख ६९ हजार ८८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बॉक्स

२४ तासांतील मृत्यू

मागील २४ तासांमध्ये मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील ४२ वर्षीय महिला, घुटकाळा वार्ड येथील ५४ वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील ३८ वर्षीय पुरुष, पंचशील चौक परिसरातील ६० वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड परिसरातील ५२ वर्षीय महिला, नेहरू नगर परिसरातील ५५ वर्षीय पुरुष, यशवंत नगर परिसरातील ५० वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील ६८ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथील ५० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील शेगाव येथील ४७ वर्षीय महिला, ५४ वर्षीय पुरुष, कढोली येथील ६५ वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष तर तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बॉक्स

तालुकानिहाय नवे बाधित

चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रा- १०३

चंद्रपूर तालुका- २६

बल्लारपूर- ४९

भद्रावती-३३

ब्रह्मपुरी- २३

नागभीड- १२

सिंदेवाही- १४

मूल- ८

सावली-६

पोंभूर्णा-५

गोंडपिपरी-६

राजूरा-२८

चिमूर-९

वरोरा-१७

कोरपना-२८

जिवती-८

इतर-२

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.