शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

आठवडाभरापासून घसरतेय कोरोना रुग्णांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST

चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दररोज अडीचशे, तीनशेच्या संख्येत आढळणारे रुग्ण आता ...

चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दररोज अडीचशे, तीनशेच्या संख्येत आढळणारे रुग्ण आता १०० च्या आणि काही वेळा ५० च्या आत आढळत आहेत. दुसरीकडे कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ ६४४ वर आली आहे.

जिल्ह्यात मागील बुधवारी ५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर २७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ९७८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ९७८ झाली आहे. सध्या ६४४ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६६ हजार ३७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४२ हजार ३०२ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

बुधवारी नव्याने बाधित झालेल्या २७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नऊ, बल्लारपूर दोन, भद्रावती तीन, ब्रम्हपुरी एक, मूल चार, चिमूर दोन, वरोरा चार व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

आतापर्यंत जिल्ह्यात ३२९ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत ३५६ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३२९ बाधितांचा समावेश आहे. उर्वरित मृत्यूमध्ये तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

निवडणुकीच्या रणधुमाळीत काळजी आवश्यक

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. अशातच सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत नागरिकांच्या भेटीगाठी आल्या. चौकाचौकात चर्चेच्या फडी आल्या. अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.