शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

नियमांना डावलून न.प. स्वीकृत सदस्यत्व

By admin | Updated: December 8, 2014 22:32 IST

बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व

कोठारी : बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व मिळवल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश सिंग यांनी बल्लारपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.अ‍ॅड. राजेश सिंग यांनी सांगितले, २०११ ला बल्लारपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी तिघांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी इंजीनियर, एम.बी. बी.एस. डॉक्टर, प्राचार्य, वकील किंवा कोणत्याही रजिस्टर संस्थेचा पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र राजु झोडे यांनी धम्म शासन सोसायटी, बल्लारपूर या संस्थेचा सहसचिव असल्याचे प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय भिक्खु सुमनवण्णे स्थवीर यांच्याकडून प्राप्त केले. परंतु, माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीवरुन सार्वजनिक विश्वस्थ संस्था नोंदणी कार्यालयाकडून राजु झोडे यांच्याकडे संस्थेचे कोणतेही पद नसल्याचे माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनीही निवडणुकीदरम्यान प्राप्त प्रमाणपत्राची शहानिशा न करता राजु झोडे यांची सदस्यपदी निवड केली. ही बाब शासनाची दिशाभूल करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार १ डिसेंबरला दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ चौकशीचा फार्स पुढे करून कारवाई करण्यास धजावत आहेत. राजु झोडे यांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप सिंग यांनी यावेळी केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल करून सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची घटना याच नगरपरिषदेत घडली असता ‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली व सदस्यत्त्व रद्द केले. मात्र, आता कारवाई करण्यास विलंब का केला जात आहे, असेही सिंग म्हणाले. बल्लारपूर पोलिसांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद असून केवळ चौकशी करीत असल्याचा देखावा करीत आहेत. राजु झोडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक सर्व दस्ताऐवज पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तरीही कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पोलीस ठोस भूमिका घेत कारवाई करीत नसल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे अ‍ॅड. सिंग यांनी यावेळी म्हटले.जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)