शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नियमांना डावलून न.प. स्वीकृत सदस्यत्व

By admin | Updated: December 8, 2014 22:32 IST

बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व

कोठारी : बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व मिळवल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश सिंग यांनी बल्लारपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.अ‍ॅड. राजेश सिंग यांनी सांगितले, २०११ ला बल्लारपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी तिघांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी इंजीनियर, एम.बी. बी.एस. डॉक्टर, प्राचार्य, वकील किंवा कोणत्याही रजिस्टर संस्थेचा पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र राजु झोडे यांनी धम्म शासन सोसायटी, बल्लारपूर या संस्थेचा सहसचिव असल्याचे प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय भिक्खु सुमनवण्णे स्थवीर यांच्याकडून प्राप्त केले. परंतु, माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीवरुन सार्वजनिक विश्वस्थ संस्था नोंदणी कार्यालयाकडून राजु झोडे यांच्याकडे संस्थेचे कोणतेही पद नसल्याचे माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनीही निवडणुकीदरम्यान प्राप्त प्रमाणपत्राची शहानिशा न करता राजु झोडे यांची सदस्यपदी निवड केली. ही बाब शासनाची दिशाभूल करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार १ डिसेंबरला दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ चौकशीचा फार्स पुढे करून कारवाई करण्यास धजावत आहेत. राजु झोडे यांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप सिंग यांनी यावेळी केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल करून सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची घटना याच नगरपरिषदेत घडली असता ‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली व सदस्यत्त्व रद्द केले. मात्र, आता कारवाई करण्यास विलंब का केला जात आहे, असेही सिंग म्हणाले. बल्लारपूर पोलिसांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद असून केवळ चौकशी करीत असल्याचा देखावा करीत आहेत. राजु झोडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक सर्व दस्ताऐवज पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तरीही कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पोलीस ठोस भूमिका घेत कारवाई करीत नसल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे अ‍ॅड. सिंग यांनी यावेळी म्हटले.जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)