शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

आता जीवनाश्यक वस्तूंसह अन्य दुकानेही उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । जिल्ह्यांतर्गत करता येणार विनापास प्रवास, मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक भागात अडकलेले नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या सावटाखाली कायम आहोत. मात्र तरीही सोमवारपासून काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य दुकानांनाही उघडण्याचे परवानगी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. मात्र ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच उघडावी लागणार आहे.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील. सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील.मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ही सोमवार ते शनिवार या दिवसांसाठी फक्त उघडे राहतील रविवारी ही दुकाने बंद राहतील. जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी कोणत्याही पासची यापुढे आवश्यकता राहणार नाही. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी प्रशासनाची परवानगी व पास घेणे बंधनकारक राहील.ऑटोरिक्षा सुरूमहानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या क्षेत्रापुरते केवळ रिक्षाचालकांना परवानगी असणार आहे. यामध्ये रिक्षाचालक व केवळ दोन प्रवासी एवढीच प्रवाश्यांची मुदत राहणार आहे. या प्रवासी क्षमतेच उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात येईल. दुचाकी वाहनावर केवळ एक व्यक्तीला परवानगी राहील तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर दोन व्यक्ती म्हणजेच तीन व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.हे बंदच राहणारउपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा-तंबाखु विक्री इत्यादी बंदच राहील. जिल्ह्याच्या सीमा आजही बंद आहेत. आंतरराज्य व जिल्हा यांची मनुष्य वाहतूक याला पूर्णता बंदी आहे.सार्वजनिक कार्यक्रम रद्दचजिल्ह्यामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा विषयक प्रदर्शने व शिबिरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, इत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार