शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना पीडब्ल्युडीने बजाविले नोटीस

By admin | Updated: June 12, 2017 00:42 IST

येथील अंमलनाला रस्त्यावरील वॉर्ड नं. ४ मध्ये रस्त्याच्या कडेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बऱ्याच

गडचांदुरातील अतिक्रमणधारकांना शौचालयासाठी अनुदानलोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : येथील अंमलनाला रस्त्यावरील वॉर्ड नं. ४ मध्ये रस्त्याच्या कडेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बऱ्याच दिवसांपासून अनेक नागरिक अतिक्रमण करून झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. नगर परिषदेतर्फे अतिक्रमणधारकांकडून भोगवटा कर सुद्धा वसूल केल्या जात आहे. त्यांना वीज, पाणी सुविधाही सुद्धा पुरविल्या जात आहेत. मात्र अतिक्रमणाची जागा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील नागरिकांना नोटीस बजावले असून अतिक्रमण काढण्याचे फर्माण सोडले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३० जूनपर्यंत गडचांदूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नगर परिषदेने केला आहे. या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शौचालय’ अनुदान देण्यात येत आहे. नगर परिषद गडचांदूरच्या वतीने अंमलनाला रोडवरील अतिक्रमणधारकांना सुद्धा शौचालय अनुदान मंजूर करण्यात आले असून येथील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला शौचालय बांधकाम सुरू केले आहे. मात्र अतिक्रमण केलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून या विभागाला शौचालय बांधकाम होत असल्याचे लक्षात येताच अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली असून बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण गडचांदूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करून ज्या परिवारांनी शासनाच्या योजनेस सहकार्य केले, त्यांनाच आता बेघर होण्याची वेळ आली आहे. शासनाचे अनुदान तर वाया जाणारच आहे. परंतु येथील रहिवाशांना अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शौचालय न झाल्यामुळे गडचांदूर शहर हागणदारीमुक्तीचा संकल्प सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही.नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना अनुदान देण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधणे आवश्यक होते. मात्र तसे न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. पालिकेने बांधकाम विभागाशी समन्वय साधून तोडगा काढावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे महासचिव सतीश बेतावार, विक्रम येरणे, आदिवासी सेलचे अध्यक्ष प्रवीण मेश्राम, प्रवीण झाडे, प्रितम सातपुते यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढावेअंमलनाला रोडवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचवेळी अतिक्रमण काढायला पाहिजे होते. मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अतिक्रमण न काढल्याने संपूर्ण रस्त्याच्या बाजुला दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे.