शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अतिक्रमणधारकांना पीडब्ल्युडीने बजाविले नोटीस

By admin | Updated: June 12, 2017 00:42 IST

येथील अंमलनाला रस्त्यावरील वॉर्ड नं. ४ मध्ये रस्त्याच्या कडेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बऱ्याच

गडचांदुरातील अतिक्रमणधारकांना शौचालयासाठी अनुदानलोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : येथील अंमलनाला रस्त्यावरील वॉर्ड नं. ४ मध्ये रस्त्याच्या कडेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बऱ्याच दिवसांपासून अनेक नागरिक अतिक्रमण करून झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. नगर परिषदेतर्फे अतिक्रमणधारकांकडून भोगवटा कर सुद्धा वसूल केल्या जात आहे. त्यांना वीज, पाणी सुविधाही सुद्धा पुरविल्या जात आहेत. मात्र अतिक्रमणाची जागा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील नागरिकांना नोटीस बजावले असून अतिक्रमण काढण्याचे फर्माण सोडले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३० जूनपर्यंत गडचांदूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नगर परिषदेने केला आहे. या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शौचालय’ अनुदान देण्यात येत आहे. नगर परिषद गडचांदूरच्या वतीने अंमलनाला रोडवरील अतिक्रमणधारकांना सुद्धा शौचालय अनुदान मंजूर करण्यात आले असून येथील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला शौचालय बांधकाम सुरू केले आहे. मात्र अतिक्रमण केलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून या विभागाला शौचालय बांधकाम होत असल्याचे लक्षात येताच अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली असून बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण गडचांदूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करून ज्या परिवारांनी शासनाच्या योजनेस सहकार्य केले, त्यांनाच आता बेघर होण्याची वेळ आली आहे. शासनाचे अनुदान तर वाया जाणारच आहे. परंतु येथील रहिवाशांना अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शौचालय न झाल्यामुळे गडचांदूर शहर हागणदारीमुक्तीचा संकल्प सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही.नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना अनुदान देण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधणे आवश्यक होते. मात्र तसे न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. पालिकेने बांधकाम विभागाशी समन्वय साधून तोडगा काढावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे महासचिव सतीश बेतावार, विक्रम येरणे, आदिवासी सेलचे अध्यक्ष प्रवीण मेश्राम, प्रवीण झाडे, प्रितम सातपुते यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढावेअंमलनाला रोडवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचवेळी अतिक्रमण काढायला पाहिजे होते. मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अतिक्रमण न काढल्याने संपूर्ण रस्त्याच्या बाजुला दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे.