शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
3
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
4
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
5
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
6
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
7
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
8
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
9
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
10
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
11
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
12
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
13
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
14
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
15
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
16
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
17
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
18
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
19
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
20
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
Daily Top 2Weekly Top 5

मिश्र रोपवन जळीतप्रकरणी अद्याप कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST

आगीत जळून खाक झालेल्या मिश्र रोपवनाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी : शिवनपायली येथील नागरिकांची मागणी पळसगाव ...

आगीत जळून खाक झालेल्या मिश्र रोपवनाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी : शिवनपायली येथील नागरिकांची मागणी

पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोडधा येथील वनविभागाचे मिश्र रोपवन १६ फेब्रुवारीला जळून खाक झाले. या रोपवनाला रोजंदारी वनमजुरांनी साईड बाउंडरी जाळण्यासाठी आग लावली आणि या आगीने हवेच्या झुळकीने संपूर्ण रोपवन जळून खाक झाले. स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात इसमविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शिवनपायली येथील नागरिकांनी ही आग वनविभागाच्या रोजंदारी मजुरांनी बॉर्डर साफ करण्यासाठी लावल्याचा आरोप केला आहे.

पाच दिवस होऊनही वनविभागाने अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. या गंभीर बाबीची योग्यरीत्या चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवनपायली येथील नागरिकांनी केली आहे. सन २०१९ ला वनविभाग ब्रम्हपुरी अंतर्गत, वनपरिक्षेत्र तळोधी(प्रादेशिक), उपक्षेत्र, नेरी निमक्षेत्र बोळधा कक्ष क्र ४२४ येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात २० हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले होते. या रोपवनात एकूण २२ हजार अनेक प्रजातींची रोपे लावण्यात आली होती. या रोपवनावर शासनाने मागील दोन वर्षात अंदाजे करोडो रुपये खर्च करून मिश्र प्रकारचे सुंदर रोपवन तयार केले होते. अनेक प्रकारचे झाडे तयार होऊन सुंदर रोपवन तयार झाले होते. परंतु वनमजुरांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचे करोडो रुपयाचे क्षणात नुकसान झाले, असा आरोप शिवनपायली येथील नागरिकांनी केला आहे.

कोट

मी शेतात रोपवनाजवळ बैल चारीत असताना वनमजुरांनी साईड व काठावरचे गवत पेटवले. त्यामुळे ही आग लागली. सर्व रोपवन जळून खाक झाले. तेव्हा दोषींवर कडक कारवाई वनविभागाने करावी.

- वामन बोरकर, ग्रामस्थ, शिवनपायली

कोट

रोपवनात उंच असलेला गवत व कचरा जळाला. परंतु ब्रिडिंग केल्यामुळे रोपे जळाली नाही. या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

-खोब्रागडे, क्षेत्र सहायक, नेरी.