शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

निप्पॉन डेन्रोची अधिग्रहित जमीन परत मिळणार

By admin | Updated: July 17, 2015 00:57 IST

काही वर्षांपूर्वी भद्रावती तालुक्यातील गवराळा, विंजासन, तेलवासा, ढोरवासा, लोणार (रिठ) , रुयार (रिठ), चिरादेवी या गावांसह एकूण आठ गावातील

हंसराज अहीर यांची माहिती : आठ गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासाभद्रावती : काही वर्षांपूर्वी भद्रावती तालुक्यातील गवराळा, विंजासन, तेलवासा, ढोरवासा, लोणार (रिठ) , रुयार (रिठ), चिरादेवी या गावांसह एकूण आठ गावातील शेतजमिनी निप्पॉन डेन्रो प्रकल्पासाठी एमआयडीसीने अधिग्रहीत केल्या होत्या. मात्र अनेक वर्षांपासून येथे ुउद्योग सुरू न झाल्याने त्या जमिनी पडीत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या संदर्भात नुकतीच एमआयडीसी अधिकारी व निप्पॉन डेन्रोच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी ही जमीन हवी नसल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निप्पॉन डेन्रो प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन मूळ प्रकल्पग्रस्तांना परत मिळणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर मंगळवारी भद्रावती येथे आले असता, त्यांनी अधिग्रहीत केलेल्या जनिमीबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे भद्रावती तालुक्यातील आठ गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ना. अहीर यांनी सांगितले की, केईसीएमएल कोळसा खाण सुरू करतेवेळी करार करण्यात आला होता. सात वर्षांपर्यंत कोळसा काढल्यानंतर उत्खनन केलेली जमीन बुजवून अर्धी जमीन मूळ प्रकल्पग्रस्तांना देण्याचे ठरविण्यात आले होते. ती जमीन प्रकल्पग्रस्तांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्य:स्थिीत बरांज येथील एम्टाची कोळसा खाण बंद असून या खाणीकरीता महाजनकोकडून मागणी करण्यात आली होती. वेकोलिने मागणी न केल्यामुळे केपीसीएल कंपनीला देण्यात आली. मात्र अजूनपर्यंत जमिनीची लीज केपीसीएलच्या नावाने महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी एम्टाच्या अधिकाऱ्यांनी खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून याबाबतची माहिती जाणून घेतली असता, शासनाच्या आदेशापर्यंत कुणीही प्रवेश करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. येथील प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सरकारी नोकरी व गावचे पुनर्वसन झाल्याशिवाय उत्खनन करू देणार नसल्याचे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव राहुल सराफ, जि.प. सदस्य विजय वानखेडे, रवी नागपुरे, वरोऱ्याचे तालुका संघटक ओमप्रकाश मांडवकर, नरेंद्र जीवतोडे, प्रवीण सातपुते, चंद्रकांत गुंडावार, बालु ताठे, गोपाल गोसवाडे, राजू भलमे, महेश तराळे, गजानन कामतवार, प्रवीण ठेंगणे, मंगेश लोणारकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)