शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची अर्थसंकल्पात उपेक्षा

By admin | Updated: April 24, 2016 01:06 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने नियमित ...

नियमितच्या प्रतीक्षेत : शासनाने दाखविली केराची टोपलीपेंढरी (कोके) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने नियमित न केल्यामुळे सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांची या अर्थसंकल्पात उपेक्षाच झाली. शासनाने या विषयात तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती संघटनेने केली आहे.तब्बल २५ वर्षांपासून राज्यातील अंदाजे दीडशे ग्रेडर, शिपाई, टंकलेखक, चालक, मदतनिस व इतर रोजंदारी कर्मचारी शासनाने नियमित करावे, यासाठी लढा देत आहेत. सदर अस्थायी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग व राज्याचे अर्थ नियोजन, वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना यापूर्वी अनेकदा लेखी निवेदन दिली. परंतु त्या निवेदनाला सर्वांनी केराची टोपली दाखवून सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांची उपेक्षाच केली. रोजंदारी कर्मचारी हे तब्बल २० ते २५ वर्षांपासून अजूनही अस्थायी स्वरूपातच सेवेत कार्यरत आहेत. त्यातील काही कर्मचारी हे निवृत्त होत आहेत तर काहींना एक-दोन वर्षे शिल्लक आहेत. परंतु त्यांना अजूनही शासनाने स्थायी न केल्यामुळे सदर कर्मचारी हे गेल्या २५ वर्षांपासून अल्पश: मानधनावर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मर्यादा ही २० वर्षांची असते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ५ ते १० वर्षातच महामंडळाचा कर्मचारी हा स्थायी करावा लागतो, असा शासनाचा नियम आहे. मग २५ वर्षानंतरही सदर कर्मचाऱ्यांना शासनाने अजुनपर्यंत स्थायी का केले नाही, असा प्रश्न संघटनेला पडला आहे. याबाबत ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. संघटनेनेदेखील आपल्या मागण्यांचा वारंवार पुरवठा केला.मात्र शासनाने सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण सांगून वारंवार मागणीला केराची टोपली दाखवून सारवासारव केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी शासनाने या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार स्थायी आदेश काढले तर याचिका मागे घेण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे. तसेच शासनाच्या चुकीमुळे सेवाज्येष्ठता नसताना सुद्धा महाराष्ट्रातील काही अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी कसे काय केले? याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतर कर्मचाऱ्यांना शासन नियमित का करीत नाही, असा गंभीर प्रश्न संघटनेला पडला आहे. ना. मुनगंटीवार हेच हा प्रश्न मार्गी लावू शकतात व सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतात, असे कर्मचाऱ्यांना वाटते. (वार्ताहर)