शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची अर्थसंकल्पात उपेक्षा

By admin | Updated: April 24, 2016 01:06 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने नियमित ...

नियमितच्या प्रतीक्षेत : शासनाने दाखविली केराची टोपलीपेंढरी (कोके) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने नियमित न केल्यामुळे सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांची या अर्थसंकल्पात उपेक्षाच झाली. शासनाने या विषयात तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती संघटनेने केली आहे.तब्बल २५ वर्षांपासून राज्यातील अंदाजे दीडशे ग्रेडर, शिपाई, टंकलेखक, चालक, मदतनिस व इतर रोजंदारी कर्मचारी शासनाने नियमित करावे, यासाठी लढा देत आहेत. सदर अस्थायी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग व राज्याचे अर्थ नियोजन, वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना यापूर्वी अनेकदा लेखी निवेदन दिली. परंतु त्या निवेदनाला सर्वांनी केराची टोपली दाखवून सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांची उपेक्षाच केली. रोजंदारी कर्मचारी हे तब्बल २० ते २५ वर्षांपासून अजूनही अस्थायी स्वरूपातच सेवेत कार्यरत आहेत. त्यातील काही कर्मचारी हे निवृत्त होत आहेत तर काहींना एक-दोन वर्षे शिल्लक आहेत. परंतु त्यांना अजूनही शासनाने स्थायी न केल्यामुळे सदर कर्मचारी हे गेल्या २५ वर्षांपासून अल्पश: मानधनावर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मर्यादा ही २० वर्षांची असते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ५ ते १० वर्षातच महामंडळाचा कर्मचारी हा स्थायी करावा लागतो, असा शासनाचा नियम आहे. मग २५ वर्षानंतरही सदर कर्मचाऱ्यांना शासनाने अजुनपर्यंत स्थायी का केले नाही, असा प्रश्न संघटनेला पडला आहे. याबाबत ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. संघटनेनेदेखील आपल्या मागण्यांचा वारंवार पुरवठा केला.मात्र शासनाने सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण सांगून वारंवार मागणीला केराची टोपली दाखवून सारवासारव केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी शासनाने या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार स्थायी आदेश काढले तर याचिका मागे घेण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे. तसेच शासनाच्या चुकीमुळे सेवाज्येष्ठता नसताना सुद्धा महाराष्ट्रातील काही अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी कसे काय केले? याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतर कर्मचाऱ्यांना शासन नियमित का करीत नाही, असा गंभीर प्रश्न संघटनेला पडला आहे. ना. मुनगंटीवार हेच हा प्रश्न मार्गी लावू शकतात व सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतात, असे कर्मचाऱ्यांना वाटते. (वार्ताहर)