शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संत गाडगेबाबांच्या विचाराचा आदर्श घेण्याची गरज

By admin | Updated: November 9, 2016 02:08 IST

८ नोव्हेंबरला ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबईच्या वतीने गाडगेबाबाच्या वाहनास स्मृतीवाहन म्हणून घोषित केले आहे.

रवींद्र मोहिते : स्मृतीरथाचे चंद्रपूर जिल्ह्यात स्वागतचंद्रपूर : ८ नोव्हेंबरला ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबईच्या वतीने गाडगेबाबाच्या वाहनास स्मृतीवाहन म्हणून घोषित केले आहे. या वाहनाद्वारा स्वच्छता पालखी राज्यभर फिरत आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात पालखीे आगमन झाले असून कोरपना तालुक्यातील पारडी गावातून स्वच्छता पालखीची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गाडगेबाबा गावा-गावात जाऊन स्वच्छता, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन या सारख्या गहन विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांचा विचारांचा आदर्श सर्व ग्रामस्थांना घेण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी केले.सद्या गाडगेबाबांचे वाहन स्वच्छता पालखी म्हणून राज्यभर भ्रमण करीत असून याद्वारे संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार केल्या जात आहे. स्वच्छता पालखी चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील पारडी या गावातून झाली. या पालखीचे स्वागत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, कोरपनाचे गट विकास अधिकारी डॉ. घोंसीकर यांनी केले. त्यानंतर पालखी राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, मूल या तालुक्यातील गावात जाऊन जनजागरण करण्यात आले व स्वच्छता पालखीचा समारोप सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द या गावात करण्यात आला. या ठिकाणावरुन पालखी गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांनी पालखी हस्तांतरीत करण्यात आली.पालखीचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वगात करण्यात आले. स्वच्छता पालखी चंद्रपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजू आनंदपवार, मूल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिलीप पांढरवडे, सावली तालुक्याचे गट विकास अधिकारी पंकज भोसले यांनी आपल्या कार्यक्षेत्रात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. स्वच्छता पालखीचे जिल्ह्यात कार्यक्रमाची यशस्वी आखणी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनचे प्रकाश उमक व कृष्णकांत खानझोडे यांनी केली आहे. जिल्ह्यात स्वच्छता पालखीद्वारा जनजागरण करण्यात आले असून यात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते गावागावात पालखीसोबत सहभागी झाले. (प्रतिनिधी)गाडगेबाबांनी प्राणत्यागलेले वाहन१९५० मध्ये संत गाडगेबाबांना महाराष्ट्र शासनाकडून जनजागरण करण्याकरिता वाहन भेट दिले होते. त्याच वाहनाने गाडगेबाबा महाराष्ट्रातील विविध गावात जाऊन भजन किर्तनातून लोकजागरण करण्याचे महान कार्य केले आहे. लोकांचे जनजागरण करतानाच गाडगेबाबांनी प्राण त्यागले आहे. बाबांची प्रेतयात्रा सुद्धा याच वाहनातून निघाली होती. आज गाडगेबाबा नसतील पण त्यांनी वापरलेले वाहन अस्तित्वात असून यावर्षी गाडगेबाबाच्या याच वाहनास महाराष्ट्र सरकारनी स्मृती वाहन म्हणून दर्जा प्राप्त केला आहे.