शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नागपूर विभागीय बोर्डाने विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:26 IST

चिमूर : शासनाने कोरोनाच्या संकटकाळात इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. चंद्रपूर जिल्हातील ३३ हजार ७८४ विद्यार्थी दहावीच्या बोर्डांच्या परीक्षेला ...

चिमूर :

शासनाने कोरोनाच्या संकटकाळात इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. चंद्रपूर जिल्हातील ३३ हजार ७८४ विद्यार्थी दहावीच्या बोर्डांच्या परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत. मात्र परीक्षा फी साठी घेतलेली प्रति विद्यार्थी शेकडो रुपये प्रमाणे करोडो रुपयांची रक्कम अद्यापही नागपूर बोर्डाकडेच आहे.

सध्याच्या काळात ग्रामीण भागातील जनतेसाठी एक एक रुपया महत्वाचा आहे. त्यामुळे बोर्डाने परीक्षा फी म्हणून करोडो रुपये रक्कम तातडीने परत करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर बावणकर यांनी नागपूर बोर्डाकडे केली आहे.

याबाबत लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची रक्कम लाखोच्या घरात आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एकूण परीक्षा फी किती असेल व ते पैसे बोर्डाने का अडवून ठेवले आहे, असे प्रश्न विद्यार्थी व पालक विचारात आहेत. लॉकडाऊनमुळे यावर्षी शाळा अत्यल्प काळासाठी भरल्या. विद्यार्थ्यांनी जीवाचा आटापिटा करून शक्य त्या माध्यमातून अभ्यास केला व परीक्षेची तयारी केली. बोर्डाने परीक्षा फॉर्म व परीक्षा फीदेखील घेतल्याने आता परीक्षा होणार, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र ऐन परीक्षा तोंडावर असताना ती रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला. तसेच पुढचे प्रवेश कसे होणार, गुणांकन कशा पद्धतीने केले जाणार, या बाबीसुद्धा अद्याप बोर्ड व राज्य सरकारने स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे समस्त शिक्षण क्षेत्रात संभ्रम पसरला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीचे कोट्यवधी रुपये बोर्डाकडे अडकून पडले आहे. ज्या प्रक्रियेसाठी शुल्क आकारल्या जाते, ती होणारच नसल्याने बोर्डाला ते पैसे जवळ ठेऊन घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या पैशांवर आलेले आजवरचे व्याज बोर्डाने जवळ ठेवावे मात्र विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष भास्कर बावणकर यांनी केली आहे.