शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

नागभीडची एमआयडीसी नागभीडलाच भार !

By admin | Updated: December 17, 2015 01:09 IST

नागभीड येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २५ वर्षाचा कालावधी होत असला तरी या एमआयडीसीने नागभीड तालुक्याला काय दिले, ...

एक पिढी बरबाद : भूखंड २५ वर्षांपासून धूळ खातघनश्याम नवघडे नागभीडनागभीड येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २५ वर्षाचा कालावधी होत असला तरी या एमआयडीसीने नागभीड तालुक्याला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यातच एक संपूर्ण पिढी गेली.पूर्णपणे धान शेतीवर अवलंबून असलेला हा तालुका आहे. पण गेल्या १०-१५ वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे या धानशेतीचे पार बारा वाजले आहेत. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्या गेला आहे. सतत येणारी नापिकी आणि वाढत चाललेले कर्जाचे डोंगर, यामुळे आत्महत्येसारखा मार्गही या तालुक्यातील शेतकरी पत्करायला लागला आहे. शेतकऱ्यांवर ही वेळ येवू नये यासाठी येथे शेतीला पुरक किंवा विविध उद्योगांची निर्मिती करण्यात आली असती तर या तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्य संधी निर्माण झाल्या असत्या. पण या दिशेने कोणतेच पाऊल उचलल्या न गेल्याने नागभीडची एमआयडीसी नागभीडच्या जीवावर भार झाली आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.नागभीडला एम.आय.डी.सी. मंजूर झाल्यानंतर नागभीड-नागपूर राज्य महामार्गावर नवखळानजिक या एम.आय.डी.सी.साठी जमीन अधिग्रहीत करण्यात आली. उद्योगासाठी शेकडो प्लॉट पाडण्यात आले. या प्लॉटच्या वितरणाची प्रक्रियासुद्धा पार पाडण्यात आली. अतिशय अल्पावधीत हे प्लॉट वितरित करण्यात आले. पण प्लॉट वितरित झाल्यानंतर या प्लॉटधारकांनी काय ‘दिवे’ लावले याची शहानिशा करण्याची जबाबदारी संबंधित विभागाने घेतली असती तर नागभीडच्या एम.आय.डी.सी. वर आज जी अवकळा आली आहे, ती अवकळा कदाचित आली नसती.उद्योगाच्या नावावर स्वस्तात प्लॉट मिळतात म्हणून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो लोकांनी येथे प्लॉट बुक करून घेतले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या प्लॉटधारकांचा ‘उद्योग’ प्लॉट बुक करण्यापलिकडे पुढे सरकलाच नाही. आज जर कोणीही या एम.आय.डी.सी.चा फेरफटका मारला तर उजाड माळरानापलिकडे या एम.आय.डी.सी.त काहीच दिसत नाही. नाही म्हणायला या एम.आय.डी.सी.मध्ये दोन-चार उद्योग सुरू आहेत. पण त्यांच्यातही कोणाच्या हाताला उद्योग देण्याची क्षमता नाही.शासनाला या एमआयडीसीची खरोखरच प्रगती बघायची असेल तर गेल्या २५ वर्षात ज्यांनी ज्यांनी येथील प्लॉट बुक केले आहेत, त्यांच्याकडून अगोदर हे प्लॉट परत घेण्याची प्रक्रीया सुरू करावी. प्लॉट परत घेतल्यानंतर नवीन लोकांना प्लाट वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्यक्रम द्यावा, निश्चितच अवघ्या काही वर्षात यात बदल जाणवेल.