शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

तीन महिन्यांपासून सोयाबीन विकूनही ४१९ शेतकऱ्यांना नाफेडने ठेवले चुकाऱ्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:33 IST

शेतकरी आर्थिक अडचणीत : डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलेलाच

प्रवीण खिरटकर लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सोयाबीन निघताच बाजारभाव कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासनाची एजन्सी नाफेडला कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरामार्फत हमीभावाने सोयाबीन विकले. २४ तासांत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश असतानाही शासनाच्या एजन्सीने तीन महिन्यांपासून ४१९ शेतकऱ्यांना चुकाऱ्यापासून वंचित ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

शेतकऱ्यांनी आवश्यक दस्तऐवज देऊन सोयाबीन हमीभावाने विक्रीकरिता नोंदणी केली. त्यानंतर नाफेडद्वारे लघुसंदेश मिळाल्यानंतर शेतकरी आपले सोयाबीन घेऊन नाफेडकडे जात होते. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरामार्फत सोयाबीन खरेदी करून नाफेडकडे दिले जात होते. सोयाबीन विकल्यानंतर अवघ्या काही दिवसांत चुकारे बैंक खात्यात जमा होतील, असा विश्वास शेतकऱ्यांचा होता. म्हणून ४१९ शेतकऱ्यांनी ७२५८ क्विंटल सोयाबीन प्रतिक्विंटल ४८९२ या हमीभावाने विकले. विकल्यानंतर तब्बल तीन महिने होऊनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. 

३१ मार्चपूर्वी कर्ज कसे भरावे?३१ मार्चपूर्वी कर्जाची रक्कम बँकेत अदा करावी लागते. त्या शेतकऱ्यांना व्याजदर लागत नाही. परंतु ४१९ शेतकऱ्यांना अजूनपर्यंत सोयाबीनची रक्कम मिळाली नाही आणि या शेतकऱ्यांनी १ एप्रिलनंतर कर्ज भरल्यास त्यांना व्याज द्यावे लागेल. त्यामुळे दुहेरी भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे.

शेतमाल घेतलाय; शेतकऱ्यांचे पेमेंट कराशेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांनी घेतल्यास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २४ तासांच्या आत रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. परंतु शासनाच्या एजन्सीकडूनच तीन तीन महिने होऊनही चुकारे मिळत नसल्याने या फसवणुकीची तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे.

२४ तासातरक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश असतानाही शासनाच्या एजन्सीने तीन महिन्यांपासून ४१९ शेतकऱ्यांना चुकाऱ्यापासून वंचित ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

"बाजार समितीमार्फत नाफेडला ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले, त्यांची सगळी माहिती नाफेडला पाठवली आहे."- सचिन डहाळकर, नाफेड खरेदी प्रमुख तथा सहायक सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर