शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद झाली; आता अतिक्रमण हटवावे

By admin | Updated: April 24, 2016 01:06 IST

एखाद्या बाबतीत जमेची बाजू झाली की, लोकांच्या अपेक्षांना सुरुवात होते. नागभीडबाबत नेमके हेच होत आहे.

मार्गक्रमण करताना नाहक त्रास : अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरुंदनागभीड : एखाद्या बाबतीत जमेची बाजू झाली की, लोकांच्या अपेक्षांना सुरुवात होते. नागभीडबाबत नेमके हेच होत आहे. नागभीड नगर परिषद घोषित झाल्यापासून या नगर परिषदेकडून नागभीडकरांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. या अपेक्षेपैकी पहिली अपेक्षा येथे रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण केव्हा दूर करण्यात येते, ही आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे.आतापर्यंत नागभीडमध्ये ग्रामपंचायत कार्यरत होती. ग्रामपंचायत चालविणारे पदाधिकारी हे छोट्या छोट्या वॉर्डामधून निवडून येत असल्याने त्यांच्या काही मर्यादा होत्या. रोज तोंडावर तोंड पडते किंवा कशाला वैर विकत घ्यायचे म्हणून हे पदाधिकारी या समस्येकडे कानाडोळा करीत आले. परिणाम असा झाला की हे अतिक्रमण वाढत गेले. अतिक्रमण एवढे वाढले की काही काही ठिकाणी दोन दुचाकी वाहने एकमेकांसमोर आली तर मार्गक्रमण करण्यासाठी थोडा विचारच करावा लागतो.खरे तर नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. विविध कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तालुक्यातून दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी नागभीडला येत असतात व आल्यानिमित्ताने विविध प्रकारची खरेदीही करीत असतात. पण या हजारो आणि गावातील नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता येथील रस्त्यांमध्ये राहिली आहे का, हा खरा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.सदर प्रतिनिधीने नागभीडमध्ये एक दिवस मुद्दाम फेरफटका मारला. यावेळी दिसलेली स्थिती अतिशय विदारक आहे. येथील जनता शाळेपासून टॉकीज चौकापर्यंत असलेला रस्ता ठिक आहे. पण टॉकीज चौकापासून तर भगतसिंग चौकापर्यंत नेहमीच वर्दळ राहत असलेला रस्ता अतिक्रमणाने पार गिळून टाकला आहे. या रस्त्यावर असलेल्या विविध प्रतिष्ठानांच्या मालकांनी त्यांच्या दुकानांसमोर असलेल्या नाल्यांवर छत टाकून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाने नाल्या कोठे गायब झाल्या हेच कळत नाही. त्यातच सामान खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरत नाही. भरीस भर याच रस्त्याने शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी मालवाहू वाहने जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. अशावेळी मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विठ्ठल मंदिराकडून बाजार चौकात जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती याहून वेगळी नाही.