शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

नगरपरिषद झाली; आता अतिक्रमण हटवावे

By admin | Updated: April 24, 2016 01:06 IST

एखाद्या बाबतीत जमेची बाजू झाली की, लोकांच्या अपेक्षांना सुरुवात होते. नागभीडबाबत नेमके हेच होत आहे.

मार्गक्रमण करताना नाहक त्रास : अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरुंदनागभीड : एखाद्या बाबतीत जमेची बाजू झाली की, लोकांच्या अपेक्षांना सुरुवात होते. नागभीडबाबत नेमके हेच होत आहे. नागभीड नगर परिषद घोषित झाल्यापासून या नगर परिषदेकडून नागभीडकरांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. या अपेक्षेपैकी पहिली अपेक्षा येथे रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण केव्हा दूर करण्यात येते, ही आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे.आतापर्यंत नागभीडमध्ये ग्रामपंचायत कार्यरत होती. ग्रामपंचायत चालविणारे पदाधिकारी हे छोट्या छोट्या वॉर्डामधून निवडून येत असल्याने त्यांच्या काही मर्यादा होत्या. रोज तोंडावर तोंड पडते किंवा कशाला वैर विकत घ्यायचे म्हणून हे पदाधिकारी या समस्येकडे कानाडोळा करीत आले. परिणाम असा झाला की हे अतिक्रमण वाढत गेले. अतिक्रमण एवढे वाढले की काही काही ठिकाणी दोन दुचाकी वाहने एकमेकांसमोर आली तर मार्गक्रमण करण्यासाठी थोडा विचारच करावा लागतो.खरे तर नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. विविध कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तालुक्यातून दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी नागभीडला येत असतात व आल्यानिमित्ताने विविध प्रकारची खरेदीही करीत असतात. पण या हजारो आणि गावातील नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता येथील रस्त्यांमध्ये राहिली आहे का, हा खरा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.सदर प्रतिनिधीने नागभीडमध्ये एक दिवस मुद्दाम फेरफटका मारला. यावेळी दिसलेली स्थिती अतिशय विदारक आहे. येथील जनता शाळेपासून टॉकीज चौकापर्यंत असलेला रस्ता ठिक आहे. पण टॉकीज चौकापासून तर भगतसिंग चौकापर्यंत नेहमीच वर्दळ राहत असलेला रस्ता अतिक्रमणाने पार गिळून टाकला आहे. या रस्त्यावर असलेल्या विविध प्रतिष्ठानांच्या मालकांनी त्यांच्या दुकानांसमोर असलेल्या नाल्यांवर छत टाकून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाने नाल्या कोठे गायब झाल्या हेच कळत नाही. त्यातच सामान खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरत नाही. भरीस भर याच रस्त्याने शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी मालवाहू वाहने जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. अशावेळी मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विठ्ठल मंदिराकडून बाजार चौकात जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती याहून वेगळी नाही.