शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

महावितरणचा शाॅक, उशिरा मीटर रीडिंग घेण्याचा वीज ग्राहकांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

जिल्ह्यात थर्मल पाॅवर स्टेशन तसेच अन्य उद्योग असल्यामुळे प्रदूषण तसेच अन्य समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. यामुळे ग्राहकांना दोनशे ...

जिल्ह्यात थर्मल पाॅवर स्टेशन तसेच अन्य उद्योग असल्यामुळे प्रदूषण तसेच अन्य समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. यामुळे ग्राहकांना दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची मागणी केली जात आहे. विशेषत: येथील आमदार किशोर जाेरगेवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांना तसे

आश्वासनही दिले आहे; मात्र अद्यापपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही;मात्र ग्राहकांच्या हातात येणारे बिल दर महिन्यात वाढूनच येत असल्याने ग्राहकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेषत: उशिरा रीडिंग तसेच बिल वाटपात होणारा विलंब यामुळेही अनेक सामान्य ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यात ५ लाखांवर घरगुती वीज ग्राहक आहेत.

बाॅक्स

महावितरणचे ग्राहक घरगुती-४६८८५२

कृषी-५५७२४

औद्योगिक-५२०८

व्यावसायिक-३११८७

बाॅक्स

१०० युनिट

पहिल्या शंभर युनिटला ग्राहकांना ३.४४ रुपये इतके वीज बिल आकारले जाते. घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना शक्यतो शंभर ते दोनशे युनिटपर्यंत वीज बिल येते.

बाॅक्स

१०१ ते ३०० युनिट

वीज युनिटच्या वापरानुसार ग्राहकांना वीज बिल दिले जाते. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ७ रुपये ३४ पैसे प्रति युनिट वीज बिल आकारणी केली जाते.

बाॅक्स

३०१ युनिटपुढे

३०१ ते पुढील युनिटसाठी ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे इतका दर आकारला जातो. यासोबतच बिलामध्ये इतरही सेवेबद्दल आकारणी केली जाते. ५०० युनिटच्या पुढे रीडिंग गेल्यास यामध्ये आणखी वाढ होते.

बाॅक्स

अशा आहेत तक्रारी

दर महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये रीडिंग घेतली जाते; मात्र काहीवेळा रीडिंग घेतले नाही तरी सरासरी वीज युनिट जोडले जाते. सरासरी घेतल्यानंतर मात्र ग्राहकांना वीज कार्यालयात चकरा माऱाव्या लागतात.

वीज ग्राहक हे शहरी आणि ग्रामीण भागातील आहेत. अशावेळी आता ऑनलाईनद्वारे प्रत्येक कामांना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना सेतू केंद्राचा तसेच बाहेरील व्यक्तींचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना अतिरिक्त पैसा खर्च करावा लागत आहे.