शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कीटकजन्य व जलजन्य आजारांसंबंधी मनपा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:36 IST

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमनपातर्फे जनजागृती अभियान : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.पावसाळ्यात शहरी व ग्रामीण भागात कीटकजन्य व जलजन्य साथींचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यात मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रोसारख्या रोगांचा समावेश असतो. या रोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागात जनजागृतीसाठी हँडबिल्स वितरित करण्यात येत आहेत. एमपीडब्लू, एएनएम, व आशा वर्करमार्फत सर्वेक्षणाद्वारे तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व त्यावर औषधोपचार करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच डासअळीसंबंधी कंटेनर सर्वे करण्यात येत आहे. आवश्यक तेथे अबेट औषधी टाकण्यात येत आहे. एमपीडब्लूमार्फत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया तपासणी करण्यात येत आहे. बाह्य सेवासत्र दरम्यान कीटकजन्य व जलजन्य आजारासंबंधी आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. तसेच मनपा स्वच्छता विभागामार्फत फॉगिंग, स्प्रेर्इंग, नाली सफाई, घंटागाडीमार्फत घरा-घरातील कचरा उचलण्यात येत आहे.महानगरपालिकेच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करावे, सोसायट्यांतील रहिवाशांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ कराव्यात, परिसरात कचरा साचू देऊन नये, पिकलेली फळे खाऊ नयेत तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे. उघड्यावरील कापलेली फळे, उसाचा रस अशा गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.डासांची उत्पत्ती टाळण्याचे प्रयत्न करावेकीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती होऊ न देणे आवश्यक आहे. यासाठी घरगुती पाण्याचे उघडे साठे जसे हौद, बॅरल, ड्रम, रांजण, माठ, फुलदाण्या, वॉटर कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन यामधील पाणी, विहिर, गच्चीवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, जमिनीतील हौद, बागेतील हौद, टाक्यांच्या गळतीमुळे साचणारे पाणी, गच्चीवर व ड्रेनेज वाहिन्यांमध्ये साठलेले पाणी, घराच्या परिसरातील भंगार सामान, टायर, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, झाडांच्या कुंड्या, झाडांच्या ढोली यात साठणारे पाणी, तुंबलेली गटारे, गावाशेजारील नदी किंवा ओढा यातील साठलेले पाणी, सेफ्टीक टँक, इमारतींचे बेसमेंट येथे डासोत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी साचलेले पाणी फेकून एक दिवस कोरडा पाडावा, तसेच स्वच्छ पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.