शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कीटकजन्य व जलजन्य आजारांसंबंधी मनपा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:36 IST

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमनपातर्फे जनजागृती अभियान : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.पावसाळ्यात शहरी व ग्रामीण भागात कीटकजन्य व जलजन्य साथींचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यात मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रोसारख्या रोगांचा समावेश असतो. या रोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागात जनजागृतीसाठी हँडबिल्स वितरित करण्यात येत आहेत. एमपीडब्लू, एएनएम, व आशा वर्करमार्फत सर्वेक्षणाद्वारे तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व त्यावर औषधोपचार करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच डासअळीसंबंधी कंटेनर सर्वे करण्यात येत आहे. आवश्यक तेथे अबेट औषधी टाकण्यात येत आहे. एमपीडब्लूमार्फत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया तपासणी करण्यात येत आहे. बाह्य सेवासत्र दरम्यान कीटकजन्य व जलजन्य आजारासंबंधी आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. तसेच मनपा स्वच्छता विभागामार्फत फॉगिंग, स्प्रेर्इंग, नाली सफाई, घंटागाडीमार्फत घरा-घरातील कचरा उचलण्यात येत आहे.महानगरपालिकेच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करावे, सोसायट्यांतील रहिवाशांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ कराव्यात, परिसरात कचरा साचू देऊन नये, पिकलेली फळे खाऊ नयेत तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे. उघड्यावरील कापलेली फळे, उसाचा रस अशा गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.डासांची उत्पत्ती टाळण्याचे प्रयत्न करावेकीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती होऊ न देणे आवश्यक आहे. यासाठी घरगुती पाण्याचे उघडे साठे जसे हौद, बॅरल, ड्रम, रांजण, माठ, फुलदाण्या, वॉटर कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन यामधील पाणी, विहिर, गच्चीवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, जमिनीतील हौद, बागेतील हौद, टाक्यांच्या गळतीमुळे साचणारे पाणी, गच्चीवर व ड्रेनेज वाहिन्यांमध्ये साठलेले पाणी, घराच्या परिसरातील भंगार सामान, टायर, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, झाडांच्या कुंड्या, झाडांच्या ढोली यात साठणारे पाणी, तुंबलेली गटारे, गावाशेजारील नदी किंवा ओढा यातील साठलेले पाणी, सेफ्टीक टँक, इमारतींचे बेसमेंट येथे डासोत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी साचलेले पाणी फेकून एक दिवस कोरडा पाडावा, तसेच स्वच्छ पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.