शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कन्हारगाव अभयारण्य निर्मितीच्या हालचाली

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६ व्या बैठकीत प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मिती संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा,

स्थानिकांचा मात्र विरोध : समिती स्थापन करण्याचे निर्देश सुरेश रंगारी कोठारीराष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६ व्या बैठकीत प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मिती संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. मात्र प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मितीसाठी स्थानिक गावकऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध दर्शविला आहे.उत्तर चंद्रपूर प्रदेश, चंद्रपूर अंतर्गत मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह क्षेत्राचा अभयारण्य निर्मितीसाठी शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला आहे. क्षेत्रामध्ये चांदा वनप्रकल्प विभागांतर्गत ३११३४.६३२ हेक्टर क्षेत्र महामंडळाच्या ताब्यात आहे. यामुळे मध्य चांदा विभाग कायमचा बंद करावा लागणार आहे. महामंडळाने १९७० ते २०१५ पर्यंत १७२११.८०४ हेक्टर क्षेत्रात साग रोपवन केलेली आहे. त्याची किंमत अब्जो रुपये आहे. प्रति वर्षी कोट्यवधी रुपयांच्या महसूलाला मुकावे लागणार आहे. यामुळे वनविकास महामंडळाचे मोठे नुकसान होणार असून कार्यरत कर्मचाऱ्यांवर स्थानांतर पदान्वत, नोकरीतून कमी करणे इत्यादी प्रश्न निर्माण होणार आहेत.स्थानिक जनतेचे प्रचंड नुकसानमध्य चांदा वनप्रकल्प विभागाअंतर्गत असलेल्या झरण, कन्हारगाव, तोहोगाव व धाबा परिक्षेत्रातील ४८ गावातील लोक महामंडळाच्या कामावर अवलंबून आहेत. प्रतिवर्ष सरासरी दोन लाख मजूर दिन निर्माण होत असून जंगल परिसरातील जंगल सीमेला लागून असलेल्या गावातील सरासरी दररोज दोन हजार मजूर कामावर असतात. या मजुरांना कामापासून वंचित राहावे लागणार असून कुटुंबाच्या उर्दरनिर्वाहासाठी इतरत्र भटकावे लागणार आहे. त्यांना मजुरीची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. अशात वने व वन्य प्राणी संवर्धन व संरक्षण योग्य प्रकारे होत असते. अभयारण्य निर्माण करुन शासन काय साध्य करणार आहे, असा सवाल गावकरी करीत आहेत. विदर्भात आधीपासूनच ताडोबा, मेळघाट, पेंच ही राष्ट्रीय उद्याने तसेच बोर, चपराळा, टिपेश्वर गुगामल, सिपान, वान व काटेपूर्णा अभयारण्य पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. असे असतानाही नागझिरा, कोका, नवीन बोर, मानासिंग देव, उमरेड, कन्हाडा या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र निर्मितीनंतर व्यवस्थापनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. तसेच बाधित लोकांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. वाघाच्या भ्रमणक्षमतेवर निष्कर्ष निघालेला नसताना मेळघाट व अन्य चार अभयारण्यामध्ये वाघाच्या शिकारी याच भागात झाल्या आहेत. वने व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन चांगले होत असताना अभयारण्य निर्माण करुन काय साध्य होणार आहे, असा सवाल चर्चिला जात आहे.(वार्ताहर)