शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या भाषणासाठी समस्यांचा डोंगर

By admin | Updated: September 6, 2014 01:41 IST

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद याचे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवाच असे निर्देश शिक्षण विभागाने दिले.

चंद्रपूर : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद याचे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवाच असे निर्देश शिक्षण विभागाने दिले. त्या दृष्टीने काही शाळांना टीव्ही संच बसविला. मात्र अनेक शाळेत टीव्ही संच नसल्यामुळे त्यांना या प्रसंगापासून मुकावे लागले. काही ठिकाणी रेडीओ लावून भाषण ऐकविण्यात आले. मात्र दुर्गम भागातील शाळांमध्ये टीव्ही असूनही दूरदर्शनवर चक्क क्रिकेट सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांचे भाषण शालेय विद्यार्थ्यांना ऐकविण्यासाठी शिक्षकांनी बरीच धावपळ केली. शिक्षण विभागाने कोणत्या शाळेत टीव्ही संच आहेत, याचा आढावाही घेतला. काही शाळांनी टीव्ही संचांची व्यवस्था केली. मात्र बहुतांश शाळा टीव्ही संचाची जुळवाजुळव करू शकल्या नाही. जिल्ह्यातील बहुतांश शाळेत टीव्ही संच नसल्याने गावातील शाळेशेजारी ज्या घरात टीव्ही आहे, अशा घराचा आधार घेऊन कार्यक्रम ऐकवण्याचा प्रयत्न केला. चंद्रपुरातील काही शाळांनी मोठी स्क्रीनची व्यवस्था केली होती. पटांगणात ही स्क्रीन ठेवून पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्यात आले. काही रेडीओचे कनेक्शन लाऊड स्पिकर जोडून प्रक्षेपण ऐकविण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यात बहुतांश जि.प. शाळेत टीव्ही संच उपलब्ध नाही त्यामुळे अनेकांनी कार्यक्रमच बघितला नाही, असे निर्दशनास आले आहे. ब्रह्मपुरी शहरात खाजगी शाळेत पंतप्रधानाचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले. परंतु ग्रामीण भागात पारडगाव, सायगाव, मालडोंगरी, गणेशपूर, अड्याळ, खेळ या गावात टीव्ही संच असल्याने भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याची तयारी करण्यात आली. बल्लारपूर तालुक्यात प्रारंभी, शाळेत प्रोजेक्टर लावण्याचा काहींनी विचार केला. मात्र, ते लावणे अवघड दिसल्यानंतर टीव्हीनेच शाळांनी काम निभावले. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच टीव्ही असल्यामुळे किती विद्यार्थ्यांना भाषण नीट ऐकू आले आणि मोदींना नीट बघता आले, हा प्रश्नच आहे. ज्या शाळांमध्ये दोन पाळ्या भरतात, अशा शाळांनी सकाळच्या पाळीतील विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता शाळेत बोलाविले. काही शिक्षकांनी टीव्ही आपल्या घरुन शाळेत आणले. मात्र, केबलचा खर्च शाळांना करावा लागला. हा खर्च अर्थात शिक्षकांनी शेअर करुन उचलला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याकरिता खास मंडप उभारले. पंतप्रधानानी मोलाचे मार्गदर्शन केले ते आवडल्याची प्रतिक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे शिक्षक दिन भरीव वाटला असेही काहींचे म्हणणे पडले. (शहर प्रतिनिधी)