शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या सावटाने चक्क दोन वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते दहावीपयर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही कोरोनाची दहशत ...

चंद्रपूर : कोरोनाच्या सावटाने चक्क दोन वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते दहावीपयर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने व आरोग्य विभागाने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पालकांमध्ये दहशत आहे. मात्र, मुलाची शैक्षणिक प्रगती खुंटू नये, यासाठी आपल्या काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवित आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात ६१७ माध्यमिक शाळा आहेत. ज्या गावात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहेत. अशा गावातील आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा १५ जुलैपासून कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १५२ शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरीही विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले नसल्याने पालकांत कोरोनाची भीती आहे.

बॉक्स -

शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघाेळही करा!

मुले शाळेमध्ये इतरांच्या संपर्कात येत असतात. तसेच खेळत बागडत असतात. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अनुमान आरोग्य विभागांनी व्यक्त केला आहे. परिणामी पालकांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत कायम आहे. त्यामुळे शाळेतून मुले घरी आल्यानंतर पहिले त्याला अंघोळ करायला लावून, कपडे बदलवायला सांगत आहेत. शाळांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाल्यास पुन्हा शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता पालक व्यक्त करीत आहेत.

बॉक्स

अ) मास्क काढू नये.

ब) वारंवार हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावे.

क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी. दरराेज हाच क्रम ठेवावा.

बॉक्स

कोरोना संसर्ग कमी असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेत काळजी घेतच मुलांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, सततच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बातम्या ऐकत असल्याने भीती वाटते. पण, मुलांना किती दिवस घरीच ठेवणार. त्यामुळे शाळेत पाठवत आहे.

-स्वप्नाली रायपुरे,

पालक

-----

गेल्या दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला हाेता. त्यात अनेकांचा काेराेनाने मृत्यू झाला. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी प्रमाणात असला तरी तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे. त्यामुळे भीती वाटते.

-रंजना गेडाम,

पालक

------

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाली आहे. मागील दोन वर्षांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, ते प्रभावी नाही. त्यामुळे मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात राहावा यासाठी शाळेत पाठवित आहे.

- वसुधा गणवीर,

पालक