शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बोळधा येथील वनविभागाचे मिश्र रोपवन आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST

२० हेक्टर जागेवरील २२ हजार रोपे जळाली पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोळधा येथील वनविभागाचे मिश्र ...

२० हेक्टर जागेवरील २२ हजार रोपे जळाली

पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोळधा येथील वनविभागाचे मिश्र रोपवन वणव्याच्या आगीत जळून खाक झाले. हे रोपवन शिवनपायली या गावाला लागून असून २० हेक्टरमध्ये होते. आग इतकी भयानक होती की रोपवन जाळून लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली; परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही.

सन २०१९ ला वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत, वनपरिक्षेत्र तळोधी (प्रादेशिक), उपक्षेत्र, नेरी निमक्षेत्र बोळधा कक्ष क्र. ४२४ येथे राज्य योजनाअंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात २० हजार हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले. यात एकूण २२ हजार अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते; परंतु १६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता लागलेल्या आगीमध्ये वाऱ्याच्या झुळकीत संपूर्ण रोपवन आगीच्या कवेत आले आणि संपूर्ण रोपवन आगीत जाळून खाक झाले. तसेच या रोपवनात असलेली तत्सम प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पती जळून नष्ट झाल्या.

ही आग कशी लागली याची सविस्तर माहिती मिळाली नाही. वनविभागाचे रोजंदारी मजूर हे रोपवनाच्या सुरक्षेसाठी काठावर कचरा साफ करून पेटवीत होते, असे शिवनपायली येथील गावकऱ्यांनी सांगितले. १६ फेब्रुवारीला मजुरांनी आग लावली आणि आंब्याच्या झाडात जेवायला बसले. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण रोपवनाच्या परिसराला कवेत घेतले. मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण ती आटोक्यात आली नाही. यात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाने याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी शिवनपायली आणि परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.