शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

किमान वेतनाचा कायदा कागदावर

By admin | Updated: November 30, 2015 00:58 IST

औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, संपन्न जिल्ह्यातीलच ६० टक्के कामगार कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत.

६० टक्के कामगार वंचित : शेकडो प्रकरणे प्रलंबितचंद्रपूर : औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, संपन्न जिल्ह्यातीलच ६० टक्के कामगार कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, राज्य शासनही किमान वेतनाबाबत फारसे गंभीर नाही. किमान वेतनाची शेकडो प्रकरणेही धूळ खात पडली आहेत.जिल्ह्यात महाऔष्णिक वीज केंद्र, एमईएल, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग यासह छोटे-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. या उद्योगात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसरात्र काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही वर्षापासून अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेतले जात आहे. कामगारहिताचे अनेक कायदे आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी कागदावरच सुरू असल्याचे चित्र आजही दिसून येते. १९४८ रोजी कामगारहिताच्या दृष्टीने किमान वेतन अधिनियमाचा कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार व्यवस्थित जीवन जगता यावे, या दृष्टीने कामगारांना वेतन देण्याची तरतूद त्यात करण्यात आली. मात्र, अजूनही चंद्रपुरातील ६० टक्के कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. हर्षल चिपळूणकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, या कायद्याची पाहिजे तशी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून ६० टक्के कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत. मागील दोन वर्षात ३० ते ३५ खटले दाखल करण्यात आले. त्यातील सुमारे चार कोटींची दोन प्रकरणे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुरू आहेत. उद्योगातील कामगारांची नोकरीची परिस्थिती सुधारून औद्योगिक शांतता निर्माण व्हावी, उत्पादनाची गती वाढावी, यासाठी औद्योगिक विवाद अधिनियम कायदा तयार करण्यात आला. या कायद्यांतर्गत संघटनेने ५९७ प्रकरणे दाखल केली. त्यापैकी ५८७ प्रकरणांवर अजूनही कोणतीच कारवाई झाली नाही.कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ही प्रकरणे ९० दिवसांच्या आत निकाली काढायची आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांची आहे. मात्र, हे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अ‍ॅड. चिपळूणकर यांनी केला. (शहर प्रतिनिधी)