शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

किमान वेतनाचा कायदा कागदावर

By admin | Updated: November 30, 2015 00:58 IST

औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, संपन्न जिल्ह्यातीलच ६० टक्के कामगार कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत.

६० टक्के कामगार वंचित : शेकडो प्रकरणे प्रलंबितचंद्रपूर : औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, संपन्न जिल्ह्यातीलच ६० टक्के कामगार कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, राज्य शासनही किमान वेतनाबाबत फारसे गंभीर नाही. किमान वेतनाची शेकडो प्रकरणेही धूळ खात पडली आहेत.जिल्ह्यात महाऔष्णिक वीज केंद्र, एमईएल, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग यासह छोटे-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. या उद्योगात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसरात्र काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही वर्षापासून अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेतले जात आहे. कामगारहिताचे अनेक कायदे आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी कागदावरच सुरू असल्याचे चित्र आजही दिसून येते. १९४८ रोजी कामगारहिताच्या दृष्टीने किमान वेतन अधिनियमाचा कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार व्यवस्थित जीवन जगता यावे, या दृष्टीने कामगारांना वेतन देण्याची तरतूद त्यात करण्यात आली. मात्र, अजूनही चंद्रपुरातील ६० टक्के कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. हर्षल चिपळूणकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, या कायद्याची पाहिजे तशी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून ६० टक्के कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत. मागील दोन वर्षात ३० ते ३५ खटले दाखल करण्यात आले. त्यातील सुमारे चार कोटींची दोन प्रकरणे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुरू आहेत. उद्योगातील कामगारांची नोकरीची परिस्थिती सुधारून औद्योगिक शांतता निर्माण व्हावी, उत्पादनाची गती वाढावी, यासाठी औद्योगिक विवाद अधिनियम कायदा तयार करण्यात आला. या कायद्यांतर्गत संघटनेने ५९७ प्रकरणे दाखल केली. त्यापैकी ५८७ प्रकरणांवर अजूनही कोणतीच कारवाई झाली नाही.कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ही प्रकरणे ९० दिवसांच्या आत निकाली काढायची आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांची आहे. मात्र, हे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अ‍ॅड. चिपळूणकर यांनी केला. (शहर प्रतिनिधी)